प.पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी यांचे विचारधन !

‘ईश्वर नित्यमुक्त आहे. सकाम कर्म केले आणि भगवंताकडे फळ मागितले, तर ते तो अवश्य देतो; पण ते फळ निकृष्ट करते, अंगलट येते. फळच न मागितले, तर फळ देण्याचे त्याचे स्वातंत्र्य कायम रहाते. योग्य वेळी प्रारब्ध अनुकूल असेल, अशा वेळी नेमके तो ते फळ देतो. जे अनेक पटींनी फळते ! न मागणार्यालाच सगळे मिळते ! भगवंताची प्रसन्नता आणि कृपाही त्यालाच लाभते. यज्ञकर्मही भगवंताला समर्पित केल्याने या सृष्टीच्या अनंत फाफट-पसार्यात त्याला ते कर्मफळाने संधी देऊन त्याचे कल्याण करते. भक्त म्हणतो, ‘‘भगवंता, तुझी इच्छा पूर्ण होऊ दे. माझ्या इच्छेचे मूल्य शून्य !’’
(साभार : मासिक ‘घनगर्जित’, एप्रिल २०२३)
धर्मशास्त्र काय सांगते ?
नामजपाचे महत्त्व !
चांगल्यात चांगले कार्य करण्यासाठी अहं न्यून असण्याचे महत्त्व !
साधकांनो, येणार्या आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी श्रद्धेच्या बळावर साधनेतील अडथळ्यांवर मात करा !
सामाजिक आणि राष्ट्रीय लाभाच्या अनुषंगाने हिंदूंची उदासीनता !