आगरतळा (त्रिपुरा) – यावर्षी त्रिपुरातील भारत-बांगलादेश सीमेवर एकूण ७१६ घुसखोरांना अटक करण्यात आली, अशी माहिती सीमा सुरक्षा दलाच्या अधिकार्याने दिली. यामध्ये ११२ रोहिंग्या मुसलमान आणि ३१९ बांगलादेशी घुसखोरांचा समावेश आहे. सीमा सुरक्षा दलाने नुकताच ५९ वा स्थापना दिवस साजरा केला. या वेळी सीमा सुरक्षा दलाच्या त्रिपुरा मुख्यालयात सैनिकांना संबोधित करतांना उपमहानिरीक्षक आर्.के. सिंह म्हणाले, ‘सीमा सुरक्षा दल बांगलादेशच्या आंतरराष्ट्रीय सीमेवर पहारा देत आहे. परिणामी त्यांनी वर्ष २०२३ मध्ये घुसखोरी करतांना ११२ रोहिंग्या मुसलमान, ३१९ बांगलादेशी घुसखोर आणि २८५ भारतियांना पकडले आहे. यावर्षी सीमा सुरक्षा दलाने सीमेवर २३ कोटी १२ लाख रुपयांचे अमली पदार्थही जप्त केले. भारताच्या या ईशान्येकडील राज्याची बांगलादेशशी ८५६ कि.मी. लांबीची सीमा आहे.

‘बालभारती’च्या इतिहासात प्रथमच १ वर्षात ४ इयत्तांची पाठ्यपुस्तके नव्याने प्रकाशित !
गळ्यातील दागिने हिसकावणार्या कामिल आणि अहमद यांना अटक !
पीडित तरुणींना दाखवले जात होते झाकीर नाईक आणि पाकिस्तानी मौलवी तारिक जमील यांचे व्हिडिओ !
विसर्जित श्रीगणेशमूर्तींच्या ‘पीओपी’पासून बनवली जाणार बाकडी, विटा अन् शोभेच्या वस्तू !
खारघर (नवी मुंबई) येथे ‘हेअर स्पा’ करतांना मुसलमान युवकाने हिंदु महिलेचे चुंबन घेतले !
भाजप तमिळनाडूचे माजी प्रदेशाध्यक्ष के. अण्णामलाई स्वत:चा पक्ष स्थापन करणार !