मणीपूरमध्ये सुरक्षादलांकडून लुटलेली ५ सहस्र शस्त्रे सापडत नाहीत, तोपर्यंत हिंसाचार थांबणार नाही ! – भारतीय सैन्य

लेफ्टनंट जनरल राणा प्रताप कलिता

इंफाळ (मणीपूर) – जोपर्यंत सुरक्षादलांकडून लुटलेली शस्त्रेे सापडत नाहीत, तोपर्यंत मणीपूरमधील हिंसाचार थांबणार नाही, असे भारतीय सैन्याकडून सांगण्यात आले. येथील ख्रिस्ती कुकी आणि हिंदु मैतेई समाज यांच्यातील हिंसाचाराला साडेसहा महिन्यांहून अधिक काळ लोटला आहे. येथे अजूनही हिंसाचार चालूच आहे. त्यावरून सैन्याने हे विधान केले.

सैन्याच्या पूर्व मुख्यालयाचे कमांडर लेफ्टनंट जनरल राणा प्रताप कलिता यांनी सांगितले की, राज्य सुरक्षा दलांकडून लुटलेली ५ सहस्र शस्त्रे अजूनही पूर्णपणे सापडलेली नाहीत. केवळ १ सहस्र ५०० शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. या समस्येवर राजकीय तोडगा निघायला हवा.