लोकांचा कल महायुतीकडे ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

मुंबई – राज्यातील एकूण २ सहस्र ३५९ ग्रामपंचायतींच्या जागांसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडल्यानंतर ६ नोव्हेंबर या दिवशी मतमोजणी झाली. यामध्ये जवळपास ६०० हून अधिक जागांवर भाजपचे उमेदवार निवडून आले आहेत. राज्यात अनेक भागांत ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये महायुतीची सरशी झाली आहे. यावर मुख्यमंत्री शिंदे यांनी मतदारांनी महायुतीला मत दिले असून लोकांचा कल महायुतीकडे आहे, असे सांगून मतदारांचे आभार मानले. या निवडणुकीत ३५० हून अधिक जागांवर उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार गटाने वर्चस्व निर्माण केले आहे. तिसरा क्रमांक हा शिंदे गटाचा आहे. त्यामुळे राज्यातील या रणधुमाळीमध्ये महायुतीची सरशी झाल्याचे चित्र आहे.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, मागील वर्षभरात महाविकास सरकारने थांबवलेली कामे ही महायुतीच्या सरकारने पूर्ण केली आहेत. या प्रकल्पांना चालना देऊन आम्ही राज्याच्या सर्वांगीण विकासाचे काम केले. खर्या अर्थाने ‘शासन आपल्या दारी’ पोचले आहे. हे सर्व मतदारांनी त्यांच्या कृतीमधून दाखवून दिले.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अग्नीशमन विभागाच्या अधिकार्यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस !
बोधगया येथे महाराष्ट्र्राच्या यात्रेकरूंना मिळणार कायमस्वरूपी निवास सुविधा ! – सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट
जलसंपदा विभागाकडून शेतकर्यांशी संबंधित सर्वच प्रक्रिया ऑनलाईन करणार ! – डॉ. राधाकृष्ण विखे पाटील, जलसंपदामंत्री
‘कारगिल विजयदिना’निमित्त डोंबिवली येथे ‘ऑपरेशन कारगिल’ आणि ‘ऑपरेशन हिफाजत’ या मोहिमांतील अनुभवकथनाचा कार्यक्रम !
सार्वजनिक ठिकाणी कचरा करण्यांविरुद्ध गुन्हा नोंदवा !
श्रीक्षेत्र कांदळी (ता. जुन्नर) येथे २९ जुलैला गुरुपौर्णिमेचे आयोजन !