‘वन्दे भारत एक्सप्रेस’ आठवड्यातून ६ दिवस धावणार  

कोकण रेल्वे मार्गावर १ नोव्हेंबरपासून उन्हाळी वेळापत्रक लागू होणार

रत्नागिरी – सद्य:स्थितीत मुंबई ते मडगाव कोकण रेल्वेमार्गावर धावणारी ‘वन्दे भारत एक्सप्रेस’ आठवड्यातील ३ दिवस चालवली जात आहे. या गाडीला प्रवाशांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत ही गाडी आठवड्यातून ६ दिवस धावणार आहे. कोकण रेल्वेचे उन्हाळी वेळापत्रक लागू करण्यात आल्यानंतर हा निर्णय घेण्यात येणार आहे.

१ नोव्हेंबरपासून रेल्वेसाठी उन्हाळी वेळापत्रक लागू होणार

कोकण रेल्वे मार्गावर १ नोव्हेंबरपासून उन्हाळी वेळापत्रक लागू करण्यात येणार आहे. त्यामुळे रेल्वेगाड्यांचा वेग वाढणार आहे. उन्हाळी वेळापत्रकानुसार मुंबई-गोवा मार्गावर काही रेल्वेगाड्यांना ताशी १०० ते १२० कि.मी. वेगाला संमती देण्यात आली आहे.