
पुणे – दावोस दौर्यात ४० कोटी रुपयांचा खर्च झाल्याचा आरोप खोटा असून या दौर्यात ३२ कोटी रुपये खर्च आला, अशी माहिती राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली. या दौर्यामध्ये १ लाख ३७ सहस्र कोटींचे १९ सामंजस्य करार झाले असून त्यामुळे १ लाख रोजगार निर्मिती होणार आहे. यामध्ये ७७ टक्के उद्योजकांना देय करारपत्रही दिले आहे. महायुती सरकारच्या काळात तिमाहीमध्ये आपले राज्य गुंतवणुकीमध्ये अग्रणी राहील, असेही ते म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा परदेश दौरा कुणाच्या ट्वीटमुळे नाही, तर नागपूर येथील पाऊस आणि राज्यातील आंदोलन यांमुळे रहित झाला असल्याचे त्यांनी सांगितले. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे तिघेही लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपाच्या संदर्भात योग्य निर्णय घेतील; कारण तिन्ही नेत्यांना राज्याची भौगोलिक, सामाजिक आणि राजकीय परिस्थिती माहिती आहे, असे त्यांनी सांगितले. पुणे दौर्यावर आल्यावर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये उद्योगमंत्री सामंत बोलत होते.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अग्नीशमन विभागाच्या अधिकार्यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस !
जलसंपदा विभागाकडून शेतकर्यांशी संबंधित सर्वच प्रक्रिया ऑनलाईन करणार ! – डॉ. राधाकृष्ण विखे पाटील, जलसंपदामंत्री
‘कारगिल विजयदिना’निमित्त डोंबिवली येथे ‘ऑपरेशन कारगिल’ आणि ‘ऑपरेशन हिफाजत’ या मोहिमांतील अनुभवकथनाचा कार्यक्रम !
सार्वजनिक ठिकाणी कचरा करण्यांविरुद्ध गुन्हा नोंदवा !
श्रीक्षेत्र कांदळी (ता. जुन्नर) येथे २९ जुलैला गुरुपौर्णिमेचे आयोजन !
पुणे येथे ‘हलाल अर्थव्यवस्था आणि भारत’ या विषयावर श्री. रमेश शिंदे यांचे ३१ जुलैला जाहीर व्याख्यान !