३५ सहस्र ६६ शासकीय पदांसाठी २७ लाखाहून अधिक अर्ज !

मुंबई –  तलाठी, जिल्‍हा परिषद आणि आरोग्‍य विभाग या तीन विभागांच्‍या ३५ सहस्र ६६ रिक्‍त जागांसाठी आतापर्यंत सरकारकडे २७ लाख ५ सहस्र ७१३ अर्ज प्राप्‍त झाले आहेत. ४ सहस्र ६५७ तलाठी पदांसाठी १० लाख ४१ सहस्र अर्ज आले आहेत. जिल्‍हा परिषदेच्‍या १९ सहस्र ४६० जागांसाठी १४ लाख ५१ सहस्र, तर आरोग्‍य विभागातील १० सहस्र ९४९ जागांसाठी २ लाख १३ सहस्र अर्ज प्राप्‍त झाले आहेत. या अर्जांचे २६५ कोटी ५४ लाख रुपये इतके शुल्‍क सरकारकडे जमा झाले आहे.