बंगालमध्ये फटाक्यांच्या अनधिकृत कारखान्यातील स्फोटात ८ जणांचा मृत्यू

  • पोलिसांना कारखान्याची आधीच देण्यात आली होती माहिती !

  • मे मासात फटाक्यांच्या एका अनधिकृत कारखान्यातही झाला होता स्फोट !

कोलकाता (बंगाल) – बंगालमधील उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील नीलगंज  येथील फटाक्यांच्या कारखान्यात झालेल्या स्फोटात ८ जणांचा मृत्यू, तर अनेक जण घायाळ झाले. मृतांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. स्फोटाच्या वेळी कारखान्यात अनेक लोक काम करत होते.
यापूर्वी मे मासामध्ये राज्यात ७ दिवसांत ३ स्फोट झाले होते. त्यांपैकी  बीरभूम जिल्ह्यातील तृणमूल काँग्रेसच्या एका नेत्याच्या घरात झाला होता, ज्यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नव्हती. त्याआधी दक्षिण २४ परगणा येथे झालेल्या स्फोटात ३ जणांचा मृत्यू झाला होता. पूर्व मेदिनीपूरमध्येही १६ मे या दिवशी फटाक्यांच्या अनधिकृत कारखान्यात हा प्रकार घडला होता. यामध्ये १२ जणांना त्यांचा जीव गमवावा लागला होता.

संपादकीय भूमिका 

राज्यात फटाक्यांचे अनधिकृत कारखाने कार्यरत असतांना आणि त्यांची माहिती पोलिसांना देण्यात येऊनही त्याकडे पोलीस दुर्लक्ष करतात, यातून त्यांना लाच देण्यात आली आहे, असे समजायचे का ? असे पोलीस आणि राज्यातील निष्क्रीय तृणमूल काँग्रेस सरकार हिंदु राष्ट्र अपरिहार्य करतात !