
बेंगळुरू (कर्नाटक) – पंतप्रधानांच्या विरोधात वापरलेले अपशब्द अपमानास्पद आहे; पण तो देशद्रोह नाही, असे सांगत कर्नाटक उच्च न्यायालयाच्या कलबुर्गी खंडपिठातील न्यायमूर्ती हेमंत चंदनगौदार यांनी एका शाळेच्या व्यवस्थापनाच्या विरोधातील देशद्रोहाचा खटला रहित केला. याखेरीज न्यायालयाने बिदरच्या पोलीस ठाण्यात अल्लाउद्दीन, अब्दुल खालिक, महंमद बिलाल आणि महंमद महताब यांच्या विरोधात नोंदवण्यात आलेला गुन्हाही रहित करण्याचा आदेश दिला.
कर्नाटक हाईकोर्ट ने एक स्कूल प्रबंधन के खिलाफ देशद्रोह के मामले को रद्द करते हुए बड़ी टिप्पणी की. #Karnataka #HighCourthttps://t.co/r1nS6Bc2uj
— AajTak (@aajtak) July 7, 2023
‘पंतप्रधानांना जोड्याने मारले पाहिजे’ असे अपशब्द उच्चारणे, हे केवळ अपमानास्पदच नाही, तर ती दायित्वशून्यताही आहे. सरकारी धोरणावर विधायक टीका करण्याची अनुमती आहे; परंतु घटनात्मक पदावर असलेल्यांचा अनादर केला जाऊ शकत नाही’, असे निरीक्षणही न्यायमूर्तींनी त्यांच्या निकालात नोंदवले.
२१ जानेवारी २०२० या दिवशी शाळेच्या इयत्ता ४थी, ५वी आणि ६वीच्या विद्यार्थ्यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एन्.आर्.सी.) या कायद्यांच्या विरोधात नाटक सादर केले होते. यानंतर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे नीलेश रक्षला यांनी तक्रार प्रविष्ट केली होती. त्यानुसार शाळेच्या व्यवस्थापनाच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा नोंदवण्यात आला होता.
बेंगळुरू (कर्नाटक) येथे पोलीस निरीक्षकाने गुंडांसमवेत मिळून तरुणांकडून लुटले २० लाख रुपये !
Telegram App Ban : ‘टेलिग्राम’ ॲपवरील तात्पुरती बंदी कायम ! – देहली उच्च न्यायालय
Supreme Court : सर्वोच्च न्यायालयाने राजकीय पक्षांतरांच्या घटनांमध्ये हस्तक्षेप करण्याची मागणी करणारी याचिका फेटाळली
विशेष अन्वेषण पथक सत्य-असत्याचा उलगडा करेल ! – Yogi Adityanath
Filmmaker Imtiaz Ali : चित्रपट निर्माते इम्तियाज अली यांची ‘राधा-कृष्ण’ यांच्यावर चित्रपट बनवण्याची इच्छा !
भित्तीपत्रक लावणार्या महिला अधिकार्याचे स्थानांतर ! – नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त