जानेवारी ते मार्च या काळात मुंबईमधून ३८३ मुली बेपत्ता !

मुंबई – गेल्या ३ मासांत म्हणजे जानेवारी ते मार्च या काळात मुंबईमधून ३८३ मुली बेपत्ता झाल्या आहेत. ही महाराष्ट्र पोलिसांनी त्यांच्या संकेतस्थळावर प्रसारित केली आहे.

‘महिला आणि मुली बेपत्ता झाल्याची आकडेवारी चिंताजनक असून गृह विभागाने याची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करावी. विभागाने शोधमोहीम राबवावी आणि केलेल्या कारवाईचा अहवाल प्रत्येकी १५ दिवसांनी आयोगाला सादर करावा’, असे महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी सांगितले.

हे ही वाचा –

भारतातून किती महिला-मुली बेपत्ता आहेत ? याची वस्तूस्थिती जाणा !
https://sanatanprabhat.org/marathi/683957.html

संपादकीय भूमिका

  • मुंबईला सुरक्षित मानणारे, तसेच ‘द केरल स्टोरी’ या चित्रपटाला विरोध करणारे या घटनेविषयी काही बोलतील का ?
  • मुंबईसारख्या उच्चभ्रू शहरातूनही मुली गायब होतात, याचा अर्थ यामागील कारणांचा गांभीर्याने शोध घेऊन कारवाई करायला हवी !