आंब्‍याच्‍या व कडूलिंबाच्‍यापानांचे महत्त्व

आंब्‍याच्‍या पानांचे महत्त्व

इतर पानांपेक्षा आंब्‍याच्‍या पानात अधिक सात्त्विकता असल्‍यामुळे त्‍यांची ईश्‍वरी तत्त्व खेचून घेण्‍याची क्षमता अधिक असते. गुढीच्‍या टोकाला आंब्‍याची पाने बांधली जातात. ईश्‍वराकडून प्रक्षेपित होणार्‍या लहरी खेचून घेण्‍याची क्षमता आंब्‍याच्‍या कोवळ्‍या पानात ३० टक्‍के, तर आंब्‍याच्‍या परिपक्‍व पानात १० टक्‍के असते. कोवळ्‍या पानात तेजतत्त्व अधिक असते, म्‍हणून पूजेत आंब्‍याच्‍या कोवळ्‍या पानांचा वापर करावा.

कडूलिंबाच्‍या पानांचे महत्त्व

गुढीला कडूलिंबाची माळ घातली जाते. कडूलिंब हे सत्त्व लहरींचे प्रतीक आहे. ईश्‍वरी तत्त्व खेचून घेण्‍याची क्षमता आंब्‍याच्‍या पानानंतर कडूलिंबाच्‍या पानात अधिक असते. या दिवशी कडूलिंबाच्‍या कोवळ्‍या पानाद्वारे वातावरणात पसरलेल्‍या प्रजापति लहरी खेचून घेतल्‍या जातात. जिवाला कडूलिंबाच्‍या पानांच्‍या माध्‍यमातून सूक्ष्म-रूपाने प्रजापति लहरी मिळत असतात.