अयोध्येतील हनुमान गढीचे महंत राजू दास यांची घोषणा !

अयोध्या (उत्तरप्रदेश) – समाजवादी पक्षाच्या ओबीसी महासंघाचे नेते स्वामी प्रसाद मौर्य यांनी ‘श्रीरामचरितमानस’वर बंदी घालण्याची मागणी केल्यानंतर येथील हनुमान गढीचे महंत राजू दास यांनी टीका करतांना मौर्य यांचा शिरच्छेद केल्यास २१ लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे. तसेच त्यांनी ‘श्रीरामचरितमानसच्या प्रती जाळणार्यांवर राज्य सरकारने कठोर कारवाई करावी’, अशीही मागणी केली आहे. ‘जर सरकारने कारवाई केली नाही, तर हिंदु जनमानस त्याच्या श्रद्धास्थानांच्या रक्षणासाठी स्वतः कारवाई करील’, असेही महंत राजू दास यांनी म्हटले आहे.
स्वामी प्रसाद मौर्य पर महंत राजू दास का विवादित बयान, कहा- स्वामी का सिर लाओ…21 लाख पाओ | #ZeeEXCLUSIVE #Ramcharitmanas #SwamiPrasadMaurya pic.twitter.com/E5reBBdOdE
— Zee News (@ZeeNews) January 30, 2023
महंत राजू दास म्हणाले की, समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव म्हणतात की, ते कधी कुणाच्याही धर्माचा अवमान करत नाहीत; मात्र त्यांच्या बोलण्यात आणि कृती करण्यात भेद आहे. त्यांनी स्वामी प्रसाद मौर्य यांना बढती देत सरचिटणीस केले. त्यांनी मौर्य यांच्यावर कारवाई करावी; कारण साधूसंतांमध्ये संताप आहे.
असे निर्णय हिंदुत्वनिष्ठ सरकारांनीही घ्यावेत !
खेळ मांडियेला मूर्तीलेपनाचा…!
गोव्यात अवैध खाणकाम : साळगावकर समूह आणि संबंधित आस्थापनांची अनुमाने १ सहस्र २३ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त
थोडक्यात महत्त्वाचे ( दि : २२.०६.२०२६ )
पंढरपूर विकासासाठी ३ सहस्र ९९३ कोटी रुपयांच्या महाआराखड्यास प्रशासकीय मान्यता !
‘ऑनलाईन फूड डिलिव्हरी’चे काम करणार्या धर्मांधाला वाकड (पुणे) येथे अमली पदार्थांची विक्री करतांना अटक !