॥ श्रीकृष्णाय नम: ॥

ग्रंथ वाचून किंवा गुरुंकडून शिकून धार्मिक कृतींचे ज्ञान झाले तरी त्यांचे कार्य शेष असते. जपाचे मंत्र, संख्या इत्यादी जाणले तरी पुढे प्रत्यक्ष जप करणे आणि त्याचे फळ मिळणे शेष असते, तसेच जप पुन्हा पुन्हा प्रतिदिन करावा लागतो. भजने, अभंग इत्यादी वाचून किंवा ऐकून माहित झाले तरी भजन करणे, अभंग गाणे शेष असते. यज्ञांचे साहित्य, मंत्र, विधी इत्यादींचे ज्ञान ग्रंथांतून किंवा गुरुंकडून झाले तरी प्रत्यक्ष यज्ञ करणे आणि त्याचे फळ मिळणे शेष असते.
आत्मज्ञानाचा (तत्त्वज्ञानाचा, ब्रह्मज्ञानाचा) उद्देश आत्मानात्मविवेक करवणे आणि आत्मा, परमात्मा, ईश्वर, ब्रह्म ह्यांच्या स्वरूपाविषयी अज्ञान दूर करणे हा असतो. एकदा आत्मा-अनात्माचा, नित्य-अनित्याचा बोध झाला की आत्मा अनित्यात गुंतत नाही. ज्ञान्याला कोणतेही कर्तव्य उरत नाही. ज्ञानाचे कार्य पूर्ण होते. गीता, उपनिषदे इत्यादी ग्रंथात सांगितलेल्या आत्मज्ञानाचा एकदा बोध झाला की अज्ञान मिटून ज्ञानाचे कार्य संपते. अज्ञान नाहीसे होणे, हे आत्मज्ञानाचे फळ आहे. पुन्हा पुन्हा काही करावे लागत नाही.
– अनंत आठवले. २५.०९.२०२२
वारकरी संप्रदायात संतसंगतीचे महत्त्व
संतांचा कार्यकर्त्यांना संदेश
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सत्संगात केलेले अनमोल मार्गदर्शन !
साधकांनो, सुदाम्याप्रमाणे श्रीकृष्णस्वरूप सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यावर नितांत श्रद्धा ठेवून साधनारत रहा आणि जीवनाचे सार्थक करून घ्या !
मानवजातीला सद्गुरुच खरे सुख देणारे ज्ञान, शांती आणि माधुर्य देतात !
वारकर्यांना ‘घुसखोर’ म्हणून हिणवणार्यांचा जाहीर निषेध, तर हिंदुत्वनिष्ठ संतांचा भव्य सन्मान करणार ! – श्री. सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती