
पुणे – आर्थिक आरक्षणाचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय न्यायालयाने नाही, तर न्यायालयाच्या घटनापिठाने दिलेला आहे. सर्वोच्च न्यायालयाचे प्राधान्य सामाजिक विषमतेपेक्षा आर्थिक विषमतेला असल्याचे दिसून येते. मागच्या दाराने मनुस्मृती आणायचा प्रयत्न चालू आहे, असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला.
आंबेडकर पुढे म्हणाले की, संविधानाने मागासवर्ग असे कलम १६ (अ) मध्ये वापरले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जाणीवपूर्वक ‘जात’ शब्द वापरला नाही. जातविरहित परिस्थितीकडे जाण्याची परिस्थिती असतांना नवीन आर्थिक आरक्षण संमत करणे, हे घटनाविरोधी आणि चुकीचे आहे. राज्यघटनेत केवळ सामाजिकदृष्ट्या मागास जाती-जमातींना आरक्षणाची तरतूद केली आहे. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या मागासांना नवीन आरक्षण देण्याचा निर्णय चुकीचा पायंडा पाडणारा आहे.
संपादकीय भूमिका
|
चिपळूणच्या गोवळकोट धक्का येथे पावसाळापूर्व ‘मॉक ड्रिल’ : आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेची सज्जता !
लोटे (खेड) येथील औद्योगिक वसाहत आणि परिसरातील गावांवर तीव्र पाणीटंचाईचे संकट
कर्नाटक आणि महाराष्ट्र यांच्या मुख्यमंत्र्यांची २० जूनला पाण्यासाठी महत्त्वाची बैठक
गडचिरोलीमधील लोहखनिज खाणी देण्याची मुख्यमंत्र्यांकडून मागणी
पावसाळ्यापूर्वी वीजवाहिन्यांच्या दुरुस्तीची कामे पूर्णत्वाकडे !
येत्या १५ दिवसांत येणार ‘माझा फ्लॅट’ योजना ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री