६ सहस्र रुपये दंड वसूल

वर्धा – प्रवाशांचा प्रवास वाहनांतून सुरक्षित होण्यासाठी येथील उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून वाहनांची पडताळणी मोहीम राबवण्यात येत आहे. ११ दिवसांच्या मोहिमेत इतर जिल्ह्यांसह वर्धा जिल्ह्यातील तब्बल ५३ वाहने दोषी आढळली असून त्यांच्याकडून ६ सहस्र रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने जिल्ह्यातील १३० वाहने आणि इतर जिल्ह्यांतील ८६ अशा २१६ वाहनांची पडताळणी करण्यात आली आहे.
मागील आठवड्यात मध्यरात्री नाशिकजवळ ट्रॅव्हल्सला लागलेल्या आगीत अनेकांचा नाहक बळी गेला होता. शासनाकडून सुरक्षिततेच्या दृष्टीने नियमावली देण्यात आलेली असूनही त्यांची पायमल्ली होत असल्याने अशा घटनांना सामोरे जावे लागत आहे.
थोडक्यात महत्त्वाचे : ०६.०६.२०२६
‘श्री महालक्ष्मीदेवी मंदिर परिसर विकास आराखड्या’तील १३६ जागांचे सर्वेक्षण पूर्ण ! – डॉ. विजय राठोड, जिल्हाधिकारी, कोल्हापूर
हिंजवडी ‘आयटी पार्क’ मधील ‘थिंकटेक इंडिया’ आस्थापन रातोरात बंद !
आरे परिसरातील ८० एकर जागेत ५ लाख वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ !
श्री महालक्ष्मीदेवी मंदिरासह परिसरातील गड-दुर्ग यांना एकत्र करून ‘टुरिस्ट सर्किट’ करणार ! – शंभूराज देसाई, खनिजकर्ममंत्री
महिला पर्यटकांचे व्हिडिओ काढणार्याला अटक