चाळिशीनंतर गुडघे दुखू नयेत, यासाठी गुडघ्यांना नियमित तेल लावा !

वैद्य मेघराज पराडकर

‘वयाच्या चाळिशीनंतर आरोग्याच्या विविध समस्या उद्भवू लागतात. यांतील बर्‍याच जणांना भेडसावणारी समस्या म्हणजे ‘गुडघेदुखी’. गुडघेदुखी होऊ नये म्हणून किंवा ती असल्यास सुसह्य व्हावी, यासाठी चाळिशीनंतर प्रत्येकानेच प्रतिदिन दिवसातून न्यूनतम एकदा गुडघ्यांना तेल लावायला हवे. यासाठी कोणतेही खाद्य तेल किंवा औषधी तेल वापरल्यास चालते. रात्री झोपण्यापूर्वी किंवा सकाळी उठल्यावर अंघोळीपूर्वी तेल लावावे. गुडघ्यांना लावलेले तेल न्यूनतम ३० मिनिटे रहायला हवे. नंतर धुतल्यास चालते.’

– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२३.८.२०२२)