
इस्लामाबाद – काश्मीरची समस्या सोडवण्यासाठी युद्ध हा पर्याय नाही. आम्हाला भारतासमवेत असलेला सीमावाद सोडवायचा आहे. आम्हाला कायमस्वरूपी शांतता हवी आहे. पाकिस्तान आणि भारत यांनी व्यापार आणि अर्थकारण या क्षेत्रांमध्ये एकमेकांशी स्पर्धा केली पाहिजे, असे नक्राश्रू पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी अमेरिकेच्या हार्वर्ड विद्यापिठात विद्यार्थ्यांशी संवाद साधतांना ढाळले. सध्या पाकिस्तान आर्थिक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे. कंगाल झालेल्या पाकिस्तानला भारताशी युद्ध पेलवणार नाही. त्याचे अर्थकारण सुधारण्यासाठी त्याला भारताशी विविध क्षेत्रांत व्यापार करायचा आहे. त्या पार्श्वभूमीवर शरीफ यांनी हे वक्तव्य केल्याचे सांगितले जात आहे.
#IEWorld | Want ‘permanent peace’ with India; war never an option to resolve Kashmir issue: Pak PM Sharif#ShehbazSharif #Kashmirhttps://t.co/34ItOmoSSJ
— The Indian Express (@IndianExpress) August 20, 2022
संपादकीय भूमिकापाकिस्तानच्या पंतप्रधानांच्या या वक्तव्यावर भारताने विश्वास न ठेवता त्याच्या विरोधात आक्रमक धोरण अवलंबणेच आवश्यक आहे ! |
Teesta River Project : बांगलादेशाने भारताऐवजी चीनला दिला ९ सहस्र कोटी रुपयांचा तिस्ता नदी प्रकल्प
US Attack on the Chabahar port : अमेरिकेचे इराणमधील भारताने विकसित केलेल्या चाबहार बंदरावर मोठे आक्रमण
BLA Attack : पाकिस्तानच्या सैन्य ताफ्यावर आक्रमण करून ४५ हून अधिक सैनिकांना ठार मारले ! – ‘बलुच लिबरेशन आर्मी’चा दावा
China Uyghur Muslims : संस्कृती आणि भाषा नष्ट करण्याचे चीन सरकारचे कारस्थान असल्याचा आरोप
ED Investigation : भारतात बांगलादेशी आणि रोहिंग्या यांची घुसखोरी करण्यासाठी विदेशातून अर्थपुरवठा !
संपादकीय : क्रिकेट आणि ‘हायब्रिड’ युद्ध !