५ जण घायाळ

नागपूर – शहरात पडणार्या मुसळधार पावसामुळे भालदारपुरा भागातील २०० वर्षे पुरातन शिवमंदिराचा काही भाग शेजारी असलेल्या ३ घरांवर कोसळला. ही घटना १० ऑगस्टच्या पहाटे ५ वाजता घडली. यात ५ जण घायाळ झाले असून यामध्ये ५ मासांच्या बाळाचा समावेश आहे. घरांतील ६ जणांना नागरिकांनी सुरक्षितपणे बाहेर काढून यातील ५ जणांना उपचारासाठी रुग्णालयात भरती केले.
नागपूर विद्यापिठाच्या परीक्षा रहित !
गेले ३ दिवस चालू असलेल्या पावसामुळे शहरातील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापिठाने १० ऑगस्ट या दिवशी होणार्या तीनही सत्रातील परीक्षा रहित करण्यात आल्याचे घोषित केले आहे. ‘रहित परीक्षांचे सुधारित वेळापत्रक लवकरच घोषित करण्यात येईल’, असेही विद्यापिठाने कळवले आहे, तसेच शहरातील शाळांना सुटी देण्यात आली आहे.
कौटुंबिक भूमी वाटणीच्या वाटपाचे धोरण सरकारकडून निश्चित !
लहान बाळांना गोमांस खाण्याचा सल्ला देणार्यांवर गुन्हा नोंदवा ! – विश्व हिंदु परिषद
केरळ आणि तमिळनाडू यांचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांच्या हस्ते ‘चैतन्य’ दिनदर्शिकेचे प्रकाशन !
ड्रोन, रोबोट्स, स्वयंचलित वाहने यांसाठी ‘महाराष्ट्र स्वयंचलित प्रणाली’ घोषित !
ग्रामीण पातळीपर्यंत दर्जेदार इंटरनेटसाठी ‘महानेट डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड’ स्थापन !
संस्कार, संस्कृत भाषा आणि सनातन हिंदु संस्कृती यांचे पुनरुज्जीवन ही काळाची आवश्यकता ! – सदाशिव ढवळेगुरुजी, सहमंत्री, ‘संस्कृत भारती’