५ जण घायाळ

नागपूर – शहरात पडणार्या मुसळधार पावसामुळे भालदारपुरा भागातील २०० वर्षे पुरातन शिवमंदिराचा काही भाग शेजारी असलेल्या ३ घरांवर कोसळला. ही घटना १० ऑगस्टच्या पहाटे ५ वाजता घडली. यात ५ जण घायाळ झाले असून यामध्ये ५ मासांच्या बाळाचा समावेश आहे. घरांतील ६ जणांना नागरिकांनी सुरक्षितपणे बाहेर काढून यातील ५ जणांना उपचारासाठी रुग्णालयात भरती केले.
नागपूर विद्यापिठाच्या परीक्षा रहित !
गेले ३ दिवस चालू असलेल्या पावसामुळे शहरातील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापिठाने १० ऑगस्ट या दिवशी होणार्या तीनही सत्रातील परीक्षा रहित करण्यात आल्याचे घोषित केले आहे. ‘रहित परीक्षांचे सुधारित वेळापत्रक लवकरच घोषित करण्यात येईल’, असेही विद्यापिठाने कळवले आहे, तसेच शहरातील शाळांना सुटी देण्यात आली आहे.
पनवेल येथे मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिर
अकोला येथे ‘गुरु-शिष्य परंपरा : आधुनिक शिक्षणासाठी प्राचीन प्रणाली’ यावर व्याख्यान !
आषाढी वारीनिमित्त ‘बंगाली एज्युकेशन सोसायटी स्कूल’च्या विद्यार्थ्यांनी काढली हरिनाम दिंडी !
मोपा येथील ‘फॉर्म्युला रेसिंग’ स्पर्धेसाठी वीजदेयकात २ कोटी रुपयांची सवलत
राष्ट्रपतींना पाठवायचे निवेदन साहित्यिकांकडून मराठी राजभाषा निर्धार समितीकडे सुपुर्द
सर्वाेच्च न्यायालयाचा निवाडा होईपर्यंत कळसा-भंडुरा प्रकल्पांना वन मंत्रालयाची संमती मिळणार नाही !