
नवी देहली – कोरोना लसीकरण अभियान संपल्यानंतर लगेचच नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) लागू करण्यात येईल, अशी घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केली आहे. बंगालच्या विधानसभेतील विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांनी अमित शहा यांची भेट घेतली. तेव्हा शहा यांनी अधिकारी यांना हे आश्वासन दिल्याची माहिती त्यांनी दिली. ११ डिसेंबर २०१९ या दिवशी संसदेत सीएए संमत करण्यात आला आणि दुसर्या दिवशी अधिसूचना जारी करण्यात आली. केंद्रशासनाने अद्याप कायद्यासाठीची नियमावली सिद्ध केलेली नाही. अनेक विरोधी पक्षांनी सीएएला विरोध केलेला असतांनाही अमित शहा यांनी तो लागू करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
Will implement #CAA once #COVID19 vaccination drive is over: #AmitShah https://t.co/vx7gTvRxeQ
— DNA (@dna) August 2, 2022
काय आहे नागरिकत्व सुधारणा कायदा ?
‘धार्मिक छळाला कंटाळून अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांगलादेश या देशांतून ३१ डिसेंबर २०१४ पर्यंत भारतात आलेल्या हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारशी आणि ख्रिस्ती समुदायाच्या लोकांना अवैध स्थलांतरित मानले जाणार नाही आणि त्यांना भारतीय नागरिकत्व दिले जाईल’, अशी तरतूद नागरिकत्व सुधारणा कायद्यात करण्यात आली आहे. यामुळे श्रीलंकेतील तमिळ, म्यानमारमधील मुसलमान आणि पाकिस्तानातील मुसलमानांतील अन्य समुदायातील व्यक्तींना या कायद्याचा लाभ मिळणार नाही.
केरळम्मधील ‘इंडियन युनियन मुस्लिम लीग’च्या पहिल्या महिला आमदाराने रेस्टॉरंटचे उद्घाटन दीप प्रज्वलनाने केल्याने कट्टरतावाद्यांची टीका
भारतीय व्यापार्यांनी ‘हलाल अर्थव्यवस्थे’चा धोका ओळखून त्याला विरोध करणे आवश्यक !
२ सख्ख्या हिंदु बहिणींचा छळ करणार्या पसार आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद !
दुबईत नोकरी लावण्याच्या आमीषाने धर्मांधाकडून हिंदु शिक्षिकेवर अत्याचार : ६ तोळे सोने आणि लाखो रुपयांची लूट !
मुंबई विमानतळावर ५ कोटी रुपयांचे सोने जप्त, ७ जणांना अटक !
Bangladeshis At Hakimpur : हकीमपूर (बंगाल) येथील सीमेवर प्रतिदिन २०० ते ३०० बांगलादेशी परत जाण्यासाठी पोचत आहेत !