काबूल – अफगाणिस्तानमध्ये तालिबानची सत्ता आल्यानंतर १० मासांनी भारताने तेथील भारतीय दूतावास पुन्हा चालू केला. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये तालिबानने अफगाणिस्तानची सत्ता हस्तगत केल्यावर भारताने हा दूतावास बंद केला होता. अफगाणिस्तानला मानवतावादी साहाय्य पुरवण्याच्या प्रयत्नांच्या दृष्टीने आणि अफगाणिस्तानच्या लोकांशी करण्यात येत असलेल्या संपर्कावर बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी भारतीय तांत्रिक पथक काबूलमध्ये पोचले आहे. अफगाणिस्तानातील भूकंपग्रस्त लोकांसाठी भारताकडून जीवनावश्यक वस्तू पाठवण्यात येत आहे, अशी माहिती भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिली. अफगाणिस्तानात दूतावास पुन्हा चालू करण्याच्या भारताच्या निर्णयाचे अफगाणिस्तानने स्वागत केले. आंतरराष्ट्रीय राजनैतिक नियमांनुसार दूतावासाच्या परिसराच्या सुरक्षेची काळजी घेतली जाईल, असे आश्वासन अफगाणिस्तानच्या तालिबानी सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अब्दुल कहर बल्खि यांनी दिले.
सनातन प्रभात > Post Type > बातम्या > आंतरराष्ट्रीय बातम्या > भारताने अफगाणिस्तानातील दूतावास पुन्हा उघडला : तालिबानकडून स्वागत
भारताने अफगाणिस्तानातील दूतावास पुन्हा उघडला : तालिबानकडून स्वागत
नूतन लेख
- Ukraine FM India Visit : (म्हणे) ‘सोव्हिएत युनियन संपुष्टात आले असल्याने भारत आणि रशिया यांच्यातील संबंधांना भविष्य नाही !’ – युक्रेन
- Bangladesh India Out Campaign : विरोधकांनी प्रथम त्यांच्या पत्नींच्या भारतीय साड्या जाळून दाखवाव्यात ! – बांगलादेशाच्या पंतप्रधान शेख हसीना
- Nijjar Murder Case : भारत सरकारसमवेत एकत्रितपणे अन्वेषण चालू ठेवू ! – कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो
- UN Kejriwal Arrest : (म्हणे) ‘निवडणुकीच्या काळात लोकांचे राजकीय आणि नागरी हक्क सुरक्षित रहातील, अशी अपेक्षा !’ – संयुक्त राष्ट्र
- इस्रायलकडून सीरियातील हिजबुल्लाहच्या ठिकाणांवर आक्रमण : ३८ जणांचा मृत्यू !
- इस्रायलला पोचले १ सहस्र भारतीय कामगार !