अष्टम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनात सहभागी झाल्यामुळे भारतातील अन्य राज्यांतील हिंदूंची कठीण परिस्थिती लक्षात येणे आणि ‘आपण साधना पुष्कळ वाढवायला पाहिजे’, याची जाणीव होणे

‘मला अष्टम अखिल भारतीय हिंदु-राष्ट्र अधिवेशनात सहभागी होण्याची संधी मिळाली. या अधिवेशनात अनेक राज्यांतून हिंदु धर्माभिमानी सहभागी झाले होते. ते सर्व जण स्वत:चे अनुभव कथन करत असतांना ‘भारतातील पुष्कळ राज्यांत हिंदूंची परिस्थिती कठीण आहे’, असे लक्षात आले. आसाम राज्यातील परिस्थिती भयानक आहे. आसाममधील ९ जिल्हे मुसलमानबहुल आहेत. त्यामुळे तेथील हिंदूंना जगणे आणि उदरनिर्वाह करणे पुष्कळ कठीण झाले आहे. त्या ठिकाणच्या एक महिला हिंदु धर्माभिमानी म्हणाल्या, ‘‘आपण घरातून बाहेर पडल्यावर पुन्हा घरी यायची शाश्वती नाही.’’ तेव्हा लक्षात आले, ‘आपण सनातनच्या आश्रमात आहोत आणि गोव्यात तशी परिस्थिती नाही, तर आपण साधना किती वाढवायला पाहिजे ?’ ‘ईश्वराने ही परिस्थिती लक्षात आणून दिली’, त्यासाठी त्याच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतो आणि प्रार्थना करतो, ‘हे भगवंता, ‘तूच अधिवेशनाच्या माध्यमातून ही सूत्रे आमच्या लक्षात आणून दिलीस. आम्हाला झोकून देऊन सेवा करण्यासाठी बळ दे.’
– श्री. सुरजित नारायण जगदीश माथूर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (५.७.२०१९)
सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करतांना अल्पावधीत शारीरिक आणि मानसिक त्रास दूर होण्याच्या संदर्भात साधकाला आलेल्या अनुभूती !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या देवघरातील देवांच्या चित्रांमध्ये देवींच्या चित्रांपेक्षा अधिक प्रमाणात प्रभावळ वाढल्याचे दिसून येण्यामागील अध्यात्मशास्त्र !
‘पंडवानी’ या लोककलेच्या सादरीकरणाच्या माध्यमातून समाजात ईश्वरभक्तीचा प्रसार करण्याचे समष्टी सेवाकार्य निरपेक्षभावाने करणार्या ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या पद्मविभूषण कै. डॉ. तीजनबाई !
नमस्काराच्या मुद्रेच्या संदर्भातील सूक्ष्मातील प्रयोग
साधकाची नेमकी अडचण जाणून त्यावर अचूक उपाययोजना सांगून त्याला घडवणार्या श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ !
गुरूंना अपेक्षित अशी भावपूर्ण आणि परिपूर्ण सेवा होण्यासाठी झोकून देऊन प्रयत्न करणारे दापोली (जिल्हा रत्नागिरी) येथील श्री. शांताराम मांडवकर !