‘लँड जिहाद’

देशातील मोक्याचा सागरी किनारा, सीमाभाग इत्यादी आणि हिंदू बहुसंख्य असलेला अधिकाधिक भाग नियोजनबद्धरित्या मुसलमानबहुल करणे, त्यासाठी हिंदूंची भूमी वा घरे आर्थिक प्रलोभने दाखवून, फसवणूक करून किंवा बलपूर्वक विकत घेऊन तेथे मुसलमानांची वस्ती वाढवणे आणि हिंदूंना तेथून अक्षरशः पळवून लावणे म्हणजे ‘लँड (भूमी) जिहाद’ ! हिंदूंच्या संदर्भात जे प्रारंभी काश्मीर आणि आता आसाममध्ये होत आहे, त्याचीच पुनरावृत्ती आज भारताच्या अनेक राज्यांत चालू झाली आहे.

भारताचे इस्लामीस्तान करणे हे ‘लँड जिहाद’चे लक्ष्य !

हिंदूंच्या भूमी मोठ्या किमती देऊन विकत घ्यायच्या आणि अधिकाधिक संवेदनशील अन् मोक्याच्या भूभागांवर नियंत्रण मिळवून देशभरात इस्लामीस्तान निर्माण करण्याचा मुसलमानांचा डाव आहे. सध्या ‘मिनी पाकिस्तान’च्या नावाने जे भाग ओळखले जातात, ती त्या व्यापक षड्यंत्राचीच पूर्वसिद्धता आहे.