भाग्यनगर (तेलंगाणा) येथे मुसलमान तरुणीशी विवाह करणार्‍या हिंदु तरुणाची हत्या

हत्येत तरुणीच्या कुटुंबियांचा सहभाग

उजवीकडे नागराजू

भाग्यनगर (तेलंगाणा) – येथे मुसलमान तरुणीशी विवाह केल्यावरून २५ वर्षीय नागराजू या हिंदु तरुणाची चाकू भोसकून हत्या करण्यात आली. पोलिसांनी आरोपींना पकडले असून ते तरुणीच्या कुटुंबातील आहेत. नागराजू याने २३ वर्षीय सय्यद सुलतान हिच्याशी २ मासांपूर्वी लग्न केले होते. ते दोघेही एकमेकांना महाविद्यालयापासून ओळखत होते.

हत्येमागे कोण आहेत, याची चौकशी करा ! – आमदार टी. राजा सिंह

आमदार टी. राजा सिंह

भाग्यनगर येथील भाजपचे आमदार टी. राजा सिंह यांनी या हत्येमागे तरुणीचे कुटुंबीय सहभागी आहेत कि एखादी धार्मिक संघटना ?, याची सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी केली.

धर्मनिरपेक्ष लोक गप्प आहेत ! – भाजप

भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी ट्वीट करून म्हटले की, जर एक हिंदु मुलीच्या मुसलमान पतीला मुलीच्या कुटुंबियांनी ठार मारले असते, आतापर्यंत काय झाले असते, हे सर्वांना ठाऊक आहे. काँग्रेस, आम आदमी पक्ष, तृणमूल काँग्रेस आणि समाजवादी पक्ष इस्लामद्वेषाचा आरोप करत संयुक्त राष्ट्रांत पोचले असते; मात्र आता हिंदु मारला गेला असल्याने हा गुन्हा ‘धर्मनिरपेक्ष’ झाला आहे. यामुळेच धर्मनिरपेक्ष लोक गप्प आहेत.

संपादकीय भूमिका

  • जेव्हा हिंदु तरुणी मुसलमान तरुणाशी विवाह करते, तेव्हा ते ‘प्रेम’ असते आणि जेव्हा मुसलमान तरुणी हिंदु तरुणाशी विवाह करतो, तेव्हा तो धर्मांधांच्या दृष्टीने ‘धर्मद्रोह’ असतो आणि त्याची शिक्षा हिंदु तरुणाला अशा प्रकारचे भोगावी लागते ! अशा घटना या देशात सातत्याने घडत आहेत, याविषयी निधर्मीवादी कधीच बोलत नाहीत, हे लक्षात घ्या !