(म्हणे) ‘मुसलमान भडकले, तर देशात महाभारत घडेल !’  

काँग्रेसचे नेते मौलाना तौकीर रजा खान यांची पंतप्रधान मोदी यांना धमकी  

काँग्रेसचे नेते मौलाना तौकीर रजा खान

बरेली (उत्तरप्रदेश) – देशाची परिस्थिती सध्या ठीक नाही. आमच्या अजानच्या वेळी हनुमान चालिसा म्हटली जात आहे. तुम्ही पंतप्रधान आहात. तुमच्या देशात अशा प्रकारच्या घटना घडत आहेत आणि तुम्ही शांत आहात. जर वेळीच हे सर्व थांबवले नाही, तर देशातील मुसलमान रस्त्यावर उतरतील आणि मग त्यानंतर देशात महाभारत घडेल, अशी धमकी इत्तेहाद ए मिल्लत कौन्सिलचे अध्यक्ष आणि काँग्रेसचे नेते मौलाना तौकीर रजा खान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिली आहे. देहलीतील जहांगीरपुरी येथील अनधिकृत बांधकांवर करण्यात आलेल्या कारवाईच्या पार्श्‍वभूमीवर खान यांनी ही धमकी दिली आहे.

(सौजन्य – वन इंडिया हिंदी)

संपादकीय भूमिका 

थेट पंतप्रधानांना धमकावण्याचे दुःसाहस धर्मांध करतात, हे लक्षात घ्या ! अशी चेतावणी हिंदूंच्या संतांनी दिली असती, तर त्यांच्या विरोधात निधर्मीवाद्यांनी पोलिसांत गुन्हा नोंदवून त्यांच्यावर कारवाई करण्यास भाग पाडले असते !