
सांगली, २३ मार्च (वार्ता.) – २१ मार्च १९७७ या दिवशी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशावर लादलेली आणीबाणी उठली तो दिवस प्रत्येक वर्षी ‘लोकतंत्र सेनानी संघा’च्या वतीने ‘लोकतंत्र विजयदिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. यंदाही २१ मार्च या दिवशी सांगली येथे ‘लोकतंत्र सेनानी संघ’ सांगली यांच्या वतीने ‘लोकतंत्र विजयदिन’ साजरा करण्यात आला.


लोकनायक जयप्रकाश नारायण आणि भारतत्न नानाजी देशमुख यांच्या प्रतिमेस प्रदेश सचिव श्रीकांत शिंदे आणि प्रकाशतात्या बिरजे यांच्या हस्ते पुष्पहार घालण्यात आला. श्रीकांत शिंदे यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केले. या प्रसंगी अरविंदराव मराठे, प्रकाश मुळगुंद, अवधूत ठोसर, सुभाष कुलकर्णी, भालचंद्र बापट, विलासराव आपटे यांसह लोकतंत्र सेनानी उपस्थित होते.
स्त्री तिच्यातील चैतन्य आणि भक्ती यांद्वारे घराचे मंदिर बनवते ! – श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ, सनातन संस्था
महाराष्ट्र लोक आयुक्त कार्यालयात १४३ पदांच्या सुधारित आकृतीबंधाला मान्यता !
‘वन्दे मातरम्’ गीताचा धगधगता इतिहास आता नाशिकमध्ये !
Sewri Mumbai Muslims Attack : क्षुल्लक कारणावरून मुसलमानांकडून हिंदूंना भीषण मारहाण
Delhi Congress Protest : पंतप्रधान मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर काँग्रेसचे आंदोलन
यंदाचा ‘लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार’ राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना घोषित !