
मुंबई, १० मार्च (वार्ता.) – एस्.टी. कर्मचार्यांच्या मागण्यांविषयी अंतिम निर्णय १० मार्च या दिवशी विधान परिषदेत घोषित करणार असल्याचे परिवहनमंत्री अनिल परब यांनी म्हटले होते. याविषयी मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक होऊनही वित्तविभागाचे अधिकारी या बैठकीला उपस्थित राहू शकले नाहीत. त्यामुळे ही बैठक लांबणीवर गेली आहे. विधीमंडळाचे अधिवेशन संपण्यापूर्वी याविषयीचा निर्णय घोषित करू, असे १० मार्च या दिवशी अनिल परब यांनी सभागृहात सांगितले. ११ मार्च या दिवशी राज्याचा अर्थसंकल्प सादर करावयाचा असल्यामुळे वित्त विभागाचे अधिकारी या बैठकीला उपस्थित राहू शकले नाहीत.
राज्याचे ‘क्वांटम’ आणि ‘डीप टेक’ धोरण लवकरच आणण्यात येणार ! – मुख्यमंत्री
यवत (पुणे) येथे विनाअनुमती गर्भलिंग निदान करणारा मुख्य सूत्रधारास अटक !
मुलीला मारल्याची न्यायबाह्य स्वीकृती आरोपीने दिली होती ! – ग्रामस्थाने दिली साक्ष
पाकिस्तानशी संबंधित ‘रील्स’ पाहिल्यामुळे अहिल्यानगर येथील तरुणांची चौकशी !
वाढत्या वायू प्रदूषणामुळे पुढील ३० वर्षांत २ अंशांपर्यंत तापमानवाढीचे संकट !
गोव्यात शैक्षणिक वर्ष पुन्हा जूनपासून चालू करण्याचा प्रस्ताव