
मुंबई – भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी कथित फसवणुकीच्या जुन्या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली आहे. त्यात त्यांनी पोलिसांच्या कारवाईपासून संरक्षण देण्याची मागणी केली आहे. ‘एका कंत्राटात फसवणूक झाल्याच्या कारणाखाली ५ वर्षांपूर्वी तक्रार प्रविष्ट झाली होती. नंतर ते प्रकरण संपले होते. आता पुन्हा ते उकरून काढून आपल्याविरुद्ध कारवाई करण्याचा घाट घातला जात आहे’, अशी भीती प्रसाद लाड यांनी याचिकेतून व्यक्त केली आहे.

प्रसाद लाड यांच्यावर वर्ष २००९ मध्ये मुंबई महानगरपालिकेत आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी वर्ष २०१४ मध्ये त्यांच्यावर गुन्हाही नोंद करण्यात आला होता. प्रसाद लाड यांना मागील वर्षी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने चौकशीसाठी समन्स बजावले होते.
१८८ गावांतील ग्रामपंचायतींना गावठी मद्य निर्मितीविषयी नोटिसा !
पंढरपूर येथे तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या ९ नगरसेवकांचा भाजपला पाठिंबा !
नवी मुंबईतील १२ सहस्र अनधिकृत बांधकामांवर १५ जूनपासून सुनावणी !
जळगाव येथील अतिक्रमित पीर बाबा दर्गा भुईसपाट !
एस्.टी. प्रवासासाठी १ ऑगस्टपासून एन्.सी.एम्.सी. कार्ड बंधनकारक !
कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणार्याला पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी बँकॉकमधून कह्यात घेतले !