
मुंबई – भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी कथित फसवणुकीच्या जुन्या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली आहे. त्यात त्यांनी पोलिसांच्या कारवाईपासून संरक्षण देण्याची मागणी केली आहे. ‘एका कंत्राटात फसवणूक झाल्याच्या कारणाखाली ५ वर्षांपूर्वी तक्रार प्रविष्ट झाली होती. नंतर ते प्रकरण संपले होते. आता पुन्हा ते उकरून काढून आपल्याविरुद्ध कारवाई करण्याचा घाट घातला जात आहे’, अशी भीती प्रसाद लाड यांनी याचिकेतून व्यक्त केली आहे.

प्रसाद लाड यांच्यावर वर्ष २००९ मध्ये मुंबई महानगरपालिकेत आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी वर्ष २०१४ मध्ये त्यांच्यावर गुन्हाही नोंद करण्यात आला होता. प्रसाद लाड यांना मागील वर्षी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने चौकशीसाठी समन्स बजावले होते.
जलदगती न्यायालये स्थापन करण्याच्या पंतप्रधानांच्या निर्णयाचे स्वागत ! – डॉ. सावंत, मुख्यमंत्री
‘एकादश तीर्थयात्रा’ योजनेचा आजपासून खांडोळा येथून शुभारंभ होणार
‘मराठी अभ्यास केंद्रा’ची मराठी शाळांतील इंग्रजी बालवाड्यांविरुद्ध बैठक !
मुंबई-अहमदाबाद महामार्गावरून गोमांसाची तस्करी करणारे वाहन पकडले; दीड टन मांस जप्त
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पादुकांचे मुख्यमंत्र्यांनी घेतले दर्शन !
आजच्या थोडक्यात महत्त्वाच्या बातम्या (२४.७.२०२६)