मुख्यमंत्री स्वतः मद्य घेत नाहीत, मग जनतेला का वाईन पाजत आहेत ? – रामदास आठवले, केंद्रीयमंत्री

रामदास आठवले

संभाजीनगर – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वतः मद्य घेत नाहीत, मग जनतेला वाईन पाजवण्यासाठी सहज का उपलब्ध करून देत आहेत ? असा प्रश्न केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी उपस्थित करत महाविकास आघाडी सरकारवर टीका केली.

२१ फेब्रुवारी या दिवशी बजाजनगर येथील आम्रपाली बुद्धविहारात आयोजित केलेल्या सभेत ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता स्वतःचा उद्योग-व्यवसाय चालू करावा. त्यासाठी केंद्र सरकारकडून अनेक योजनांच्या माध्यमातून कर्ज मिळते. त्याचा लाभ तरुणांनी घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.