
जुन्नर (पुणे) – छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या युगपुरुषाने महाराष्ट्राच्या भूमीमध्ये जन्म घेतला, हे या भूमीचे आणि भूमीपुत्रांचे भाग्य आहे. शिवजयंती महाराष्ट्रावर प्रेम करणार्या लाखो शिवभक्तांच्या आशा-आकांक्षांची आहे, त्यांच्या स्वप्नपूर्तीची आहे, तसेच महाराजांच्या खांद्याला खांदा लावून लढलेल्या लाखो मावळ्यांच्या शौर्याची, त्यागाची आहे, असे गौरवोद्गार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काढले. ते किल्ले शिवनेरीवरील शिवजन्मोत्सव कार्यक्रमात बोलत होते. या वेळी राज्यातील मंत्री, विविध पदाधिकारी आणि शिवप्रेमी उपस्थित होते.

पवार पुढे म्हणाले की, मराठा आरक्षणाकरता न्यायालयात काही अडचणी आल्यावर आयोगाची स्थापना झाली. त्यानंतर ते आरक्षण सर्वोच्च न्यायालयात ५० टक्क्यांपेक्षा अधिक असल्यामुळे फेटाळण्यात आले. केंद्र सरकारने कायद्यामध्ये पालट करण्याची आवश्यकता आहे; परंतु तिन्ही पक्षांच्या नेत्यांच्या विचाराने मराठा समाजाला आरक्षण देण्यात येईल; मात्र अगोदरच्या आरक्षणांना धक्का न लावता आणि नियमांच्या चौकटीत हा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न आहे.
नेत्रदीपक रिंगण आणि बंधूभेटीनंतर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज अन् जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे पंढरपूरमध्ये आगमन !
जलदगती न्यायालये स्थापन करण्याच्या पंतप्रधानांच्या निर्णयाचे स्वागत ! – डॉ. सावंत, मुख्यमंत्री
‘एकादश तीर्थयात्रा’ योजनेचा आजपासून खांडोळा येथून शुभारंभ होणार
‘मराठी अभ्यास केंद्रा’ची मराठी शाळांतील इंग्रजी बालवाड्यांविरुद्ध बैठक !
मुंबई-अहमदाबाद महामार्गावरून गोमांसाची तस्करी करणारे वाहन पकडले; दीड टन मांस जप्त
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पादुकांचे मुख्यमंत्र्यांनी घेतले दर्शन !