काशी आणि मथुरा मुक्त होऊन भारताला ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करावे ही मागणी

सोलापूर, १९ फेब्रुवारी (वार्ता.) – येथील विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दल या संघटनांच्या कार्यकर्त्यांनी निलमनगर भागातून ‘श्री भद्राधि कोदंडराम’ या संस्थेच्या वतीने सोलापूर ते श्री क्षेत्र भद्राचलम् (तेलंगाणा) अशा सायकल यात्रेला प्रारंभ केला आहे. ‘काशी आणि मथुरा मुक्त होऊन भारताला हिंदु राष्ट्र घोषित करावे’, असा संकल्प करून कार्यकर्त्यांनी ही सायकल यात्रा चालू केली आहे. १४ फेब्रुवारीपासून चालू करण्यात आलेल्या या यात्रेमध्ये कार्यकर्ते प्रतिदिन ६० ते ७० किलोमीटरचा प्रवास करत १० दिवसांमध्ये श्री क्षेत्र भद्राचलम् (तेलंगाणा) येथे पोचणार आहेत, अशी माहिती बजरंग दलाचे रवि बोल्ली यांनी दिली.
सर्वाेच्च न्यायालयाच्या आदेशानंतर अयोध्या येथील श्रीराम मंदिराचा रस्ता मोकळा झाला. त्याप्रमाणे काशी आणि मथुरा येथील वादग्रस्त जागेचा निकाल लागावा आणि भारताला हिंदु राष्ट्र घोषित करावे, या मागणीसाठी ही १० दिवसांची यात्रा काढण्यात आली आहे.
शिक्षण सचिवांचे स्थानांतर : नवा कायदाही करणार !
‘नीट’ परीक्षेच्या ढिसाळ कारभाराच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका !
भारताचे तुकडे होण्याच्या घोषणा देणारे देशद्रोहीच ! – मनोज मुंतशीर, संगीतकार
Dr. Anand Ranganathan : ‘उपोषण म्हणजे अराजकता’, हे डॉ. आंबेडकरांचे वक्तव्य, ही सोनम वांगचुक यांना चपराक !
Taslima Nasreen : जंतरमंतरवरील आंदोलनावरून बांगलादेशातील हिंसक आंदोलनाची आठवण झाली ! – तस्लिमा नसरीन
PM Modi Fast-Track Courts : प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणांसाठी जलद गती न्यायालये स्थापन करू !