मुंबई – पश्चिम रेल्वेच्या प्रशासनाने विनातिकीट, तसेच अनधिकृतपणे सामानाची वाहतूक करणार्या प्रवाशांच्या विरोधात राबवलेल्या मोहिमेत १० मासांत ८० कोटी रुपयांचा दंड वसूल केला आहे. एप्रिल २०२१ ते जानेवारी २०२२ या कालावधीत ही मोहीम राबवण्यात आली. या कारवाईत आरक्षित रेल्वे तिकीटांचे बेकायदेशीर हस्तांतराचे ९ गुन्हे नोंद करण्यात आले असून संबंधितांकडून १३ सहस्र रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. या मेहिमेत ५४० भिकारी, ६१३ बेकायदेशीर फेरीवाले यांना रेल्वेच्या हद्दीतून हुसकावण्यात आले असून २४२ जणांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून १ लाख ४ सहस्र रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. एप्रिल २०२१ ते जानेवारी २०२२ या कालावधीत मुखपट्टी न लावलेल्या १४ सहस्र ४९२ प्रवाशांवर कारवाई केली.
सनातन प्रभात > Post Type > बातम्या > राष्ट्रीय बातम्या > विनातिकीट प्रवाशांकडून रेल्वेने १० मासांत ८० कोटी रुपये वसूल केले !
विनातिकीट प्रवाशांकडून रेल्वेने १० मासांत ८० कोटी रुपये वसूल केले !
नूतन लेख
- सर्वोच्च न्यायालयाचे निवाडे मराठी आणि कोकणी भाषांत मिळतील ! – सरन्यायाधीश चंद्रचूड
- गोव्यात न्यायालयीन अकादमी चालू करा ! – सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड
- दादर बाजारपेठेच्या मुख्य रस्त्यावर प्रतिदिन सकाळी फेकला जातोे कचरा !
- दिवाळीपूर्वी मंदिर स्वच्छता अभियान राबवून मंदिरावर भगवे ध्वज फडकावणार !
- Siddiqui’s Security Guard Suspended : बाबा सिद्दीकी यांच्या सुरक्षारक्षकाचे निलंबन
- Dinesh Gundu Rao Notice : कर्नाटकचे आरोग्यमंत्री दिनेश गुंडू राव यांना नोटीस !