श्रीलंकेने चीनकडून कर्ज घेतल्यामुळे तो चीनचा बटीक बनला आहे. आता श्रीलंका जर भारताकडे साहाय्य मागत असेल, तर कूटनीतीच्या अंतर्गत भारताने साहाय्य करून त्याला स्वतःकडे वळवण्याचा प्रयत्न करावा ! – संपादक

कोलंबो (श्रीलंका) – सध्या श्रीलंका आर्थिक संकटात सापडला असून तेथे जीवनावश्यक वस्तूंची टंचाई निर्माण झाली आहे. आवश्यक वस्तूंची आयात करण्याच्या दृष्टीने श्रीलंकेने भारताकडून १ अब्ज डॉलरचे (७ सहस्र ४०० कोटी रुपयांचे) कर्ज मागितले आहे. यासंदर्भात भारताचे विदेशमंत्री जयशंकर आणि श्रीलंकेचे वित्तमंत्री बासिल राजपक्षे यांच्यात झालेल्या एका बैठकीत भारताने अनेक करारांवर स्वाक्षरी करत सहाय्याचे आश्वासन दिले.
या बैठकीत मंत्री जयशंकर यांनी ‘श्रीलंकेच्या कह्यात असलेल्या भारतीय मासेमार्यांची लवकरात लवकर सुटका करावी’, अशी मागणी केली, तसेच ‘श्रीलंकेच्या साहाय्यासाठी भारत आंतरराष्ट्रीय स्तरावर पुढाकार घेईल’, असे आश्वासनही दिले.
दक्षिण आफ्रिकेत १७ सहस्र हिंदूंनी एकत्र येऊन केले हनुमान चालिसाचे पठण !
इराणच्या आक्रमणात जॉर्डनमधील २ अमेरिकी सैनिक ठार : अमेरिकेचे प्रत्युत्तर !
मी मुसलमान आहे; पण देशात शरीयत लागू करणार नाही ! : Burkina Faso President Ibrahim
पाकव्याप्त काश्मीरमधील आंदोलकांवरील दडपशाहीविषयी संयुक्त राष्ट्रांकडून चिंता व्यक्त !
Bangladesh Massive Protests : बांगलादेशात हिंदु तरुणाच्या अन्याय अटकेविरुद्ध अल्पसंख्यांकांची निदर्शने
Mohammad Nawaz Baned : पाकिस्तानचा क्रिकेटपटू महंमद नवाज याच्यावर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून ३ मासांची बंदी