पंजाब येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गाडीचा ताफा रोखल्याचे प्रकरण

मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गावर आंदोलन करणारे काँग्रेसचे कार्यकर्ते होते. त्या आंदोलनाला जाणीवपूर्वक अनुमती देण्यात आली. आंदोलकांना न थांबवता, ते रस्ता रोखतील, अशी व्यवस्था पोलिसांनी जाणीवपूर्वक करू दिली, असा गंभीर आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ६ जानेवारी या दिवशी पत्रकार परिषदेत केला.
कल जो पाकिस्तान की बॉर्डर के पास,पंजाब में हुआ,वो एक सोची समझी साज़िश थी!
इस के बाद कांग्रेस नेताओं के बयान बेहद शर्मनाक है।
मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी के साथ करोड़ों करोड़ों लोगों के आशीर्वाद है !
उन्हें कुछ नहीं होगा।लेकिन ऐसा षड्यंत्र करनेवालों को देश कभी माफ नहीं करेगा! pic.twitter.com/TihP0w7s1n— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) January 6, 2022
५ जानेवारी या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी पंजाब येथे सार्वजनिक सभेला जात असतांना आंदोलकांनी त्यांच्या गाडीचा ताफा अडवला. त्यामुळे पंतप्रधानांना १५-२० मिनिटे रस्त्यावर थांबावे लागले. त्यानंतर पंतप्रधानांना माघारी फिरावे लागले. या गंभीर प्रकाराविषयी देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत वरील आरोप केला.
या वेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘‘ही देशातील आजपर्यंतची गंभीर घटना आहे. देशात अनेक वेळा वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळी सरकारे पाहिली आहेत. पंतप्रधान वेगळ्या पक्षाचे असले, तरी मुख्यमंत्री अन्य पक्षांचे असतात. असे असले, तरी देशाच्या पंतप्रधानांच्या सुरक्षिततेविषयी अशा प्रकारचा खेळ पाहिला नाही.
पंजाबमधील कालच्या घटनेनंतर काँग्रेस नेत्यांची विधाने हा निर्लज्जतेचा कळस.
मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना संपूर्ण देशाचा आशीर्वाद.
त्यांच्याविरुद्ध असे कटकारस्थान करणाऱ्यांना देश कधीच माफ करणार नाही !#ModiJiJiyoHazaroSaal @narendramodi #NarendraModi pic.twitter.com/IY7q3B5pni— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) January 6, 2022
पंजाबच्या माजी मुख्यमंत्र्यांनी या घटनास्थळापासून पाकिस्तानची सीमा जवळ असल्याचे सांगितले आहे. यातून पंतप्रधानांचा जीव धोक्यात घालण्याचे काम पंजाब सरकारने जाणीवपूर्वक केले. अशा कठीण परिस्थितीत पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी दूरभाषवर येण्याचेही सौजन्य दाखवले नाही. यातून या प्रकरणात काही कट शिजल्याचे दिसून येते. पंतप्रधानांवरील आक्रमण हे व्यक्तीवर नसून देशावरील आक्रमण आहे. देशासाठी शरमेची गोष्ट आहे.
‘नीट’ परीक्षेच्या ढिसाळ कारभाराच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका !
भारताचे तुकडे होण्याच्या घोषणा देणारे देशद्रोहीच ! – मनोज मुंतशीर, संगीतकार
काँग्रेस नेत्यांनी कर्नाटकातील मंदिरांच्या १८ लाख रुपयांची केली लूट ! : भाजप
Dr. Anand Ranganathan : ‘उपोषण म्हणजे अराजकता’, हे डॉ. आंबेडकरांचे वक्तव्य, ही सोनम वांगचुक यांना चपराक !
Taslima Nasreen : जंतरमंतरवरील आंदोलनावरून बांगलादेशातील हिंसक आंदोलनाची आठवण झाली ! – तस्लिमा नसरीन
PM Modi Fast-Track Courts : प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणांसाठी जलद गती न्यायालये स्थापन करू !