उच्च न्यायालय आणि राज्यपाल यांच्याकडेही दाद मागणार !

मुंबई, २९ डिसेंबर (वार्ता.) – विद्यापीठ कायद्यातील पालट हा राज्याच्या इतिहासातील ‘काळा दिवस’ असून याविरोधात जानेवारी २०२१ च्या पहिल्या आठवड्यापासून राज्यातील सर्व विद्यापिठांमध्ये विद्यापीठ कायद्यातील तरतुदींच्या विरोधात भाजप पक्ष आणि भाजयुमो संघटनेचे कार्यकर्ते आंदोलन चालू करतील. विद्यापीठ विधेयकातील तरतुदी मागे घेईपर्यंत ते चालू राहील, अशी घोषणा विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी २८ डिसेंबर या दिवशी पत्रकार परिषदेत केली. या विद्यापीठ विधेयकातील पालटाविषयी उच्च न्यायालय आणि राज्यपाल यांच्याकडेही दाद मागण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
Devendra Fadnavis | हा तर लोकशाहीतील सर्वाधिक काळा दिवस – देवेंद्र फडणवीस #DevendraFadnvsis #Democracy #Wintersession #Mumbai #MVA pic.twitter.com/grPOQjyPzk
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 28, 2021
देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, राज्याच्या इतिहासातील सर्वांत घाबरट आणि पळपुटे सरकार असल्याने या विधेयकातील पालटावर चर्चाही टाळली, तसेच विधीमंडळ सचिवालयाने त्यांना साथ दिली. देशातील सर्व विद्यापिठांना अधिक स्वायतत्ता देण्याच्या तरतुदी होत असतांना महाराष्ट्रात उलट दिशेने प्रवास चालू आहे. विद्यापीठ कायद्यात वर्ष २०१६ मध्ये एकमताने पालट केले होते आणि विद्यापिठे राजकारणापासून दूर रहातील, असा विचार केला होता; पण या विधेयकात मंत्र्यांना प्रकुलपती करून राज्यपालांचे अधिकार अल्प केले आहेत. विद्यापिठांमधील दैनंदिन कामकाज, निविदा, नियुक्त्या आणि अन्य गोष्टी यांमध्ये राजकीय हस्तक्षेप वाढेल.
जलदगती न्यायालये स्थापन करण्याच्या पंतप्रधानांच्या निर्णयाचे स्वागत ! – डॉ. सावंत, मुख्यमंत्री
समान नागरी कायदा हवा !
‘एकादश तीर्थयात्रा’ योजनेचा आजपासून खांडोळा येथून शुभारंभ होणार
‘मराठी अभ्यास केंद्रा’ची मराठी शाळांतील इंग्रजी बालवाड्यांविरुद्ध बैठक !
मुंबई-अहमदाबाद महामार्गावरून गोमांसाची तस्करी करणारे वाहन पकडले; दीड टन मांस जप्त
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पादुकांचे मुख्यमंत्र्यांनी घेतले दर्शन !