
मुंबई – शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत शाळांना धान्य वितरण करण्याचे काम महिला बचत गटांना देण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे तांदूळ आणि डाळी शासनाकडून शाळांना देण्यात येत होत्या. ते वाटण्याचे काम शाळेतील कर्मचारी करायचे. हे सुरळीत चालू असतांना मध्येच शासनाने ‘या आहाराचे पैसे थेट विद्यार्थ्यांच्या अधिकोषाच्या खात्यात देण्यात येणार’, असे घोषित केले आणि सुका शिधाही (तांदूळ, डाळी) देणे बंद केले. आता पुन्हा २५० कोटी रुपये रकमेचे धान्य वाटप करण्याचे काम महिला बचत गटांना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
गोव्यातील धरणांतील जलसाठ्यात लक्षणीय वाढ
अंमलबजावणी संचालनालयाच्या अनेक राज्यांमध्ये एकाच वेळी धाडी
उच्च न्यायालयाच्या कडक भूमिकेनंतर मोरजी किनारपट्टीवरील २३ अनधिकृत बांधकामे पाडली
जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखीचे नेत्रदीपक रिंगण !
आज मराठी शाळांसाठी मराठी अभ्यास केंद्राची बैठक !
नगरसेवक रमेश म्हात्रे यांना ३ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी !