
१. वेळेचे पालन करणे : ‘मी सौ. अंजली बंडेवारकाकूंच्या समवेत जिज्ञासूंना संपर्क करण्याच्या सेवेसाठी जाते. त्या सेवेच्या वेळेचे नेहमी पालन करतात.
२. त्यांची स्मरणशक्ती उत्तम असून त्यांच्यात सभाधीटपणा आहे.
३. उत्तम वक्तृत्व : प्रसारातील विशेष उपक्रमांच्या वेळी उपलब्ध वेळेप्रमाणे त्या सूत्रबद्ध विषय मांडून जिज्ञासूंना मार्गदर्शन करतात, तसेच त्या वेगवेगळ्या विषयांवर लेखही सिद्ध करतात.
४. सेवेची तळमळ : काकूंचे वय ७३ वर्षे आहे, तरीही त्या घरातील सर्व कामे करून सेवा करतात.

५. प्रेमभाव : काकूंमध्ये प्रेमभाव आहे. त्यामुळे त्या रहात असलेल्या जगदंबा चौकातील सर्व लोक त्यांना ओळखतात.
६. भाव : ‘गुरुपौर्णिमेच्या प्रसारादरम्यान आम्ही साधक दुपारी डबा खाण्यासाठी त्यांच्या घरी एकत्रित येणार आहोत’, हे काकूंना कळल्यावर त्यांनी ‘माझ्या घरी माझे गुरुदेव आले आहेत’, या भावाने आमच्यासाठी साजूक तुपातील गोड खाऊ बनवला. त्या वेळी काकूंना पुष्कळ आनंद झाला होता.
७. सौ. काकूंनी त्यांच्या नातीवर चांगले संस्कार केले आहेत.
८. ‘अंजली’ या शब्दाचा जाणवलेला अर्थ
अं – अंतर्मुख होऊन
ज – जपसाधनेत
ली – लीन असणार्या सौ. अंजली बंडेवार !’
– सौ. वर्षा वैद्य, सोलापूर (३.१.२०१९)
सतत आनंदी असलेल्या आणि नृत्यकलेप्रती समर्पणभाव असलेल्या मडगाव (गोवा) येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (कु.) चांदणी आसोलकर (वय ३१ वर्षे) !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असणार्या बार्शी (जिल्हा सोलापूर) येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (श्रीमती) सुभद्रा ज्ञानोबा गोरे (वय ९२ वर्षे) !
व्यक्तीची आध्यात्मिक पातळी ५० टक्क्यांहून अधिक झाली की, तिच्या मनातील नकारात्मक विचार जाऊन तिची ईश्वराची ओढ वाढते !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ‘साधकांच्या त्रासांवरील उपाय शोधण्याच्या पद्धतीत होत गेलेले पालट’ या लिखाणाचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण !
साधकांनो, येणार्या आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी श्रद्धेच्या बळावर साधनेतील अडथळ्यांवर मात करा !