१. रामनाथी आश्रमात आल्यावर ‘संतांच्या माध्यमातून परात्पर गुरुदेवांचे कृपाछत्र अनुभवायला मिळत आहे’, याबद्दल सतत कृतज्ञता व्यक्त करणे

‘कु. सायलीच्या वडिलांच्या (रवींद्र देशपांडे यांच्या) निधनानंतर २ मासांनी ती तिची आई (श्रीमती धनश्री देशपांडे) आणि लहान भाऊ (कु. श्रीनिवास देशपांडे, वय १० वर्षे, आध्यात्मिक पातळी ६२ टक्के) यांच्या समवेत काही दिवसांसाठी रामनाथी आश्रमात रहायला आली. तेव्हापासून ‘रामनाथी आश्रमात रहायला मिळत आहे आणि आश्रमातील संत अन् सद्गुरु यांची भेट होऊन त्यांच्या माध्यमातून परात्पर गुरुदेवांचे कृपाछत्र अनुभवायला मिळत आहे’, याबद्दल कु. सायलीला पुष्कळ कृतज्ञता वाटते. ती सतत कृतज्ञता व्यक्त करत असते.
२. स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया गांभीर्याने राबवणे

सायली रामनाथी आश्रमात रहायला आल्यावर तिला स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया शिकण्यास सांगण्यात आले. त्यासाठी तिला दिवसभराचे नियोजन करून देण्यात आले. तिने स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवायला चालू केल्यापासून एकही दिवस सेवा, व्यष्टी साधनेचा आढावा किंवा भाववृद्धी सत्संग यांना जाण्याचा कंटाळा केला नाही. ती प्रतिदिन उत्साहाने नियोजनानुसार कृती करते.’
– श्री. धैवत वाघमारे (मामा), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२६.१०.२०२१)
सतत आनंदी असलेल्या आणि नृत्यकलेप्रती समर्पणभाव असलेल्या मडगाव (गोवा) येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (कु.) चांदणी आसोलकर (वय ३१ वर्षे) !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असणार्या बार्शी (जिल्हा सोलापूर) येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (श्रीमती) सुभद्रा ज्ञानोबा गोरे (वय ९२ वर्षे) !
व्यक्तीची आध्यात्मिक पातळी ५० टक्क्यांहून अधिक झाली की, तिच्या मनातील नकारात्मक विचार जाऊन तिची ईश्वराची ओढ वाढते !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ‘साधकांच्या त्रासांवरील उपाय शोधण्याच्या पद्धतीत होत गेलेले पालट’ या लिखाणाचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण !
साधकांनो, येणार्या आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी श्रद्धेच्या बळावर साधनेतील अडथळ्यांवर मात करा !