भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांची संसदेमध्ये केंद्र सरकारकडे मागणी
केंद्रात भाजपचे सरकार असल्यामुळे दुबे यांनी केंद्र सरकारकडे समान नागरी कायदा आणण्यासाठी प्रयत्न करावेत ! – संपादक

नवी देहली – स्वातंत्र्याला ७४ वर्षे पूर्ण झाल्यानंतरही आपण अद्याप समान नागरी कायदा आणू शकलेलो नाही. मी केंद्र सरकारकडे मागणी करतो की, त्याने लवकरच समान नागरी कायद्याच्या संदर्भातील निर्णय घेऊन कायदा संमत करावा, अशी मागणी भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी संसदेत केली. ‘भारताच्या एकतेसाठी हा कायदा आवश्यक असून न्यायलयानेही यासंदर्भात निर्देश दिले आहेत’, असेही दुबे यांनी या वेळी म्हटले. दुबे यांनी या वेळी अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचाही आधार घेतला. मागील मासामध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला कलम ४४ मधील सुधारणांच्या संदर्भात समिती स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत. याच कलमामध्ये देशभरातील नागरिकांसाठी सामना कायदा लागू करण्याची तरतूद आहे.
BJP MP Nishikant Dubey urges Centre to bring Uniform Civil Code; ‘Even after 75 years…’ https://t.co/3z6vdS4cS4
— Republic (@republic) December 1, 2021
समान नागरी कायदा हवा !
‘नीट’ परीक्षेच्या ढिसाळ कारभाराच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका !
भारताचे तुकडे होण्याच्या घोषणा देणारे देशद्रोहीच ! – मनोज मुंतशीर, संगीतकार
काँग्रेस नेत्यांनी कर्नाटकातील मंदिरांच्या १८ लाख रुपयांची केली लूट ! : भाजप
Dr. Anand Ranganathan : ‘उपोषण म्हणजे अराजकता’, हे डॉ. आंबेडकरांचे वक्तव्य, ही सोनम वांगचुक यांना चपराक !
Taslima Nasreen : जंतरमंतरवरील आंदोलनावरून बांगलादेशातील हिंसक आंदोलनाची आठवण झाली ! – तस्लिमा नसरीन