परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे साधनेविषयी मार्गदर्शन !

‘एखादी घटना घडली की, विज्ञान ती घडण्यामागील केवळ भौतिक कारणांचा अभ्यास करते. त्यामागे काही कार्यकारणभाव असतो, हे विज्ञानाला अद्याप कळलेले नाही, उदा. एखाद्या बसला अपघात घडून त्यामध्ये २० प्रवासी मेले आणि १ प्रवासी वाचला. या घटनेमध्ये विज्ञानाच्या दृष्टीकोनातून अपघात होण्याची कारणे ‘रस्ता खराब असणे, बसमध्ये तांत्रिक बिघाड होणे, चालकाची चूक असणे’ यांसारखी मर्यादित असतील; पण ‘त्याच २० जणांचा एकत्रित मृत्यू का झाला आणि एकच का वाचला ?’, याचे उत्तर विज्ञान देऊ शकत नाही. ‘त्या २० जणांचा मृत्यूयोग होता; म्हणून बस अपघाताच्या माध्यमातून त्यांचा एकत्रित मृत्यू झाला आणि वाचलेल्या एकाचा मृत्यूयोग नव्हता, तर ‘केवळ अपघातामध्ये सहभागी होणे, इतकेच त्याचे प्रारब्ध होते’, हे त्याचे कारण होते’, असा विचारही विज्ञान करू शकत नाही. त्यामुळे विज्ञानाला ते शोधणेही दूरच आहे. यावरून ‘विज्ञान अद्याप किती बाल्यावस्थेत आहे’, याची कल्पना येते.’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले
यात काय आश्चर्य !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधकांना सत्संगात केलेले अनमोल मार्गदर्शन !
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांनी वर्णिलेले सद्गुरुमाहात्म्य आणि त्यातून श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी उलगडलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे अवतारत्व !
सुख आणि दुःख यांत आनंदाची धार प्रवाहित करणे, हे सद्गुरूंचे मर्म असणे
प्रत्येक साधकाला प्रेमाने बांधून ठेवणारे आणि त्यांच्यावर निरपेक्ष प्रीतीचा वर्षाव करणारे एकमेवाद्वितीय सच्चिदानंद परब्रह्म परात्पर गुरु डॉ. आठवले !
साधकांनो, येणार्या आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी श्रद्धेच्या बळावर साधनेतील अडथळ्यांवर मात करा !