परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे साधनेविषयी मार्गदर्शन !

‘एखादी घटना घडली की, विज्ञान ती घडण्यामागील केवळ भौतिक कारणांचा अभ्यास करते. त्यामागे काही कार्यकारणभाव असतो, हे विज्ञानाला अद्याप कळलेले नाही, उदा. एखाद्या बसला अपघात घडून त्यामध्ये २० प्रवासी मेले आणि १ प्रवासी वाचला. या घटनेमध्ये विज्ञानाच्या दृष्टीकोनातून अपघात होण्याची कारणे ‘रस्ता खराब असणे, बसमध्ये तांत्रिक बिघाड होणे, चालकाची चूक असणे’ यांसारखी मर्यादित असतील; पण ‘त्याच २० जणांचा एकत्रित मृत्यू का झाला आणि एकच का वाचला ?’, याचे उत्तर विज्ञान देऊ शकत नाही. ‘त्या २० जणांचा मृत्यूयोग होता; म्हणून बस अपघाताच्या माध्यमातून त्यांचा एकत्रित मृत्यू झाला आणि वाचलेल्या एकाचा मृत्यूयोग नव्हता, तर ‘केवळ अपघातामध्ये सहभागी होणे, इतकेच त्याचे प्रारब्ध होते’, हे त्याचे कारण होते’, असा विचारही विज्ञान करू शकत नाही. त्यामुळे विज्ञानाला ते शोधणेही दूरच आहे. यावरून ‘विज्ञान अद्याप किती बाल्यावस्थेत आहे’, याची कल्पना येते.’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले
भारतियांचे ईश्वरप्राप्तीच्या प्रयत्नांचे अलौकिकत्व !
बंगालमधील परिवर्तनातून हिंदु राष्ट्राच्या संकल्पनेची प्रचीती !
महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने मंगळुरू (कर्नाटक) येथे भावपूर्ण वातावरणात झालेले ‘ईश्वरप्राप्तीसाठी संगीत-साधना शिबिर’ !
व्यक्तीच्या उजव्या आणि डाव्या हातांच्या अन् पायांच्या बोटांच्या रंगात भिन्नता असण्याचे कारण
सद्गुरु सत्यवान कदम यांची सुश्री मधुरा भोसले यांनी सूक्ष्म ज्ञानातून सांगितलेली गुणवैशिष्ट्ये आणि सद्गुरु सत्यवान कदम यांच्या गुणवैशिष्ट्यांच्या संदर्भात पू. शिवाजी वटकर यांना जाणवलेली सूत्रे !
देवाचे ‘देवपण’ अनुभवण्यासाठी साधना करा !