वर्ष २०१६ मध्येही झाले होते आक्रमण !
‘आतंकवाद्यांची निर्मितीकेंद्र असलेल्या पाकला नष्ट केल्यासच अशी आक्रमणे कायमची थांबतील’, हे लक्षात घेऊन सरकारने आता तरी आतंकवाद्यांचा नायनाट करावा, अशी जनतेची अपेक्षा ! – संपादक

पठाणकोट (पंजाब) – येथील सैन्यतळाच्या प्रवेशद्वारावर आतंकवाद्यांनी ग्रेनेडचा स्फोट घडवून आणला. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. दुचाकीवरून आलेल्या आतंकवाद्यांनी प्रवेशद्वाराच्या दिशेने हा ग्रेनेड फेकला. या वेळी प्रवेशद्वाराजवळून एक वरात जात होती. ‘सीसीटीव्ही फुटेज्’च्या आधारे आतंकवाद्यांचा शोध चालू आहे. या भागात वायूदलाचे तळ, सैन्यदलाचा दारुगोळा डेपो आणि सैन्याच्या तुकड्यांचे तळ आहे. जानेवारी २०१६ मध्ये जिहादी आतंकवाद्यांनी वायूदलाच्या तळावर आक्रमण केले होते. यात ८ सैनिक हुतात्मा झाले होते, तर ५ आतंकवादी ठार झाले होते.
Punjab: Grenade blast reported near Army camp gate in Pathankot; Police on high alert https://t.co/vvd3QHKPD4
— Republic (@republic) November 22, 2021
काँग्रेस देशात अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे ! – अमित साटम, प्रदेशाध्यक्ष, भाजप, मुंबई
काश्मीरमध्ये जिहादी आतंकवादी आणि भारतीय सैनिक यांच्यात चकमक : एका सैनिकाला वीरमरण
‘कॉकरोच जनता पक्षा’च्या समर्थनार्थ मुंबईत काँग्रेसचे आंदोलन !
श्रीराममंदिरात दानाची चोरी होणे, ही समाजाच्या नैतिक अधःपतनाची परिसीमा ! – न्यायमूर्ती अतुल श्रीधरन्, अलाहाबाद उच्च न्यायालय
संसदेत विरोधी पक्षांकडून गदारोळ : दोन्ही सभागृहांचे कामकाज काही घंट्यांसाठी स्थगित
लाठीमाराचे व्हिडिओ पहायला आमच्याकडे वेळ नाही !