
‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या स्नानगृहातील अंघोळीसाठी वापरण्यात येणारी प्लास्टिकची जुनी थोडी काळसर हिरव्या रंगाची बालदी माझ्याकडून खाली पडून तुटली. त्यामुळे त्यांनी मला दुसरी बालदी आणण्यास सांगितले. मी दुसरी बालदी घेऊन त्यांच्या खोलीत गेले. त्या बालदीचा रंग गडद गुलाबी होता. तो पाहून परात्पर गुरुदेवांनी मला सात्त्विक रंगाची बालदी आणण्यास सांगितले. त्यानंतर मी पांढर्या रंगाची बालदी घेऊन आले. त्यानंतर त्यांनी दोन्ही बालद्यांची ‘यू.ए.एस्.’ उपकरणाद्वारे चाचणी करण्यास सांगितले. या निरीक्षणांतून गडद गुलाबी रंगाच्या बालदीमध्ये सकारात्मक ऊर्जा काहीच नसून पुष्कळ नकारात्मक ऊर्जा असल्याचे आढळून आले. गडद गुलाबी रंगाच्या बालदीच्या तुलनेत पांढर्या रंगाच्या बालदीमध्ये नकारात्मक ऊर्जा अल्प प्रमाणात आढळून आली. बालदी प्लास्टिकची असल्यामुळे पांढर्या रंगाच्या बालदीमध्येही थोडी नकारात्मक ऊर्जा आढळून आली. गडद गुलाबी रंगाच्या बालदीकडे पाहून मला चांगले वाटले नाही; पण पांढर्या रंगाच्या बालदीकडे पाहून मला काही क्षण निर्गुण स्पंदने जाणवली. यातून ‘कोणतीही वस्तू खरेदी करतांना ती निळा, पिवळा, पांढरा इत्यादी सात्त्विक रंगाची निवडणे का आवश्यक आहे ?’, हे मला शिकायला मिळाले.’
– एक साधिका, सनातन आश्रम, रामनाथी. (११.११.२०२१)
सुख आणि दुःख यांत आनंदाची धार प्रवाहित करणे, हे सद्गुरूंचे मर्म असणे
जीवनात सर्वांत मोठी प्राप्ती ईश्वरकृपा हीच होय !
‘शरणागतभाव’ येण्यासाठी प्रक्रिया राबवतांना शिकायला मिळालेली सूत्रे
प्रामाणिक प्रयत्न करतो तो शिष्य !
‘गुरूंच्या संकल्पाने शिष्याची आध्यात्मिक प्रगती होणे’, हीच गुरुकृपा !
भक्ती ही कृती नसून २४ घंटे असणारी वृत्ती असणे