भारताने थेट पाकलाच नष्ट केले, तर आतंकवादाची समस्या मुळासकट नष्ट होईल ! – संपादक
पाक भारताच्या विरोधात कारवाया करण्यासाठी नवनवीन षड्यंत्र रचतो, तर भारत सातत्याने ते हाणून पाडण्यात धन्यता मानतो. त्यापेक्षा भारताने थेट पाकलाच नष्ट केले, तर आतंकवादाची समस्या मुळासकट नष्ट होईल ! – संपादक

श्रीनगर – जम्मू-काश्मीरच्या सीमेवर पाकने ड्रोनद्वारे पाठवलेला शस्त्रसाठा पोलिसांनी जप्त केला आहे. यामध्ये १ एके-४७ रायफल, ३० काडतुसे, ३ मॅगझिन आणि एक दुर्बिण यांचा समावेश होता. सीमेपासून भारतात ६ कि.मी. अंतरावरील सौंजना गावामध्ये ड्रोनद्वारे ही शस्त्रे टाकण्यात आली होती. पाकिस्तानकडून शस्त्रसाठा येणार असल्याची माहिती पोलिसांना आधीच मिळाली होती. त्याआधारे पोलिसांनी सौंजना गावाला घेराव घालून शोधमोहीम चालू केली होती. त्या वेळी हा साठा मिळाला. हा साठा गावात येऊन कोण व्यक्ती कह्यात घेणार होती, त्याचा पोलीस शोध घेत आहेत. मे मासामध्ये पाककडून जम्मू-काश्मीरच्या सांबा जिल्ह्यात ड्रोनद्वारे शस्त्रे पाठवण्यात आली होती.
सीमापार आतंकवादामुळे सहकार्याचा आधार संपला !
२ जिहादी आतंकवाद्यांच्या घरांवर बुलडोझर कारवाई
काश्मीरमध्ये जिहादी आतंकवादी आणि भारतीय सैनिक यांच्यात चकमक : एका सैनिकाला वीरमरण
Mohammad Rafiq Naik Arrested: पाकिस्तानी आतंकवाद्यांना साहाय्य करणार्या महंमद रफिक नाईक याला काश्मीरमधून अटक !
Pakistan Visa Ban Demand : पाकिस्तानला देण्यात येणारे आर्थिक साहाय्य आणि पाकिस्तान्यांना देण्यात येणारा व्हिसा थांबवावा !
Chargesheet Against ‘Al Halimi Foundation’ : ‘अल् हलिमी फाऊंडेशन’विरुद्ध १४ सहस्र पानांचे दोषारोपपत्र प्रविष्ट !