हे प्रशासनाला कसे कळत नाही ?

‘रस्त्यावरील बेघर आणि भिक्षेकरू यांनी देशासाठी काहीतरी केले पाहिजे. अशा लोकांना जर सगळे विनामूल्य मिळाले, तर ते काम करणार नाहीत, असे मुंबई उच्च न्यायालयाने नुकतेच स्पष्ट केले. कोरोनाच्या काळात ज्यांना रहायला घर नाही किंवा जे लोक भिक्षा मागून जीवन जगतात, अशांना मुंबई महानगरपालिकेने ३ वेळा अन्न, पिण्याचे पाणी, रहाण्यासाठी जागा आणि सार्वजनिक शौचालय आदी व्यवस्था करून द्यावी, अशी विनंती ब्रिजेश आर्य नावाच्या व्यक्तीने मुंबई महानगरपालिकेकडे केली होती.’