देशाला अपकीर्त करण्यासाठी राष्ट्रविरोधी टोळी विदेशी शक्तीचा उपयोग करत आहे ! – विनोद बन्सल, राष्ट्रीय प्रवक्ते, विश्व हिंदु परिषद

विनोद बन्सल

मुळात श्रीरामाला काल्पनिक ठरवणारे लोकच श्रीराममंदिराच्या उभारणीला विकृत मानसिकतेतून विरोध करत आहेत. या माध्यमातून राष्ट्रविरोधी कृत्ये आता उघड होत आहे. त्यामुळे केवळ श्रीराममंदिर किंवा श्रीरामजन्मभूमी यांचा हा प्रश्न नसून देशाच्या स्वाभिमानाचा प्रश्न आहे. ६० कोटी भारतियांनी ज्यासाठी ३ सहस्र ५०० कोटी रुपयांची देणगी दिली, ते श्रीराममंदिर श्रीरामाच्या कृपेने होणारच आहे. सध्या राष्ट्रविरोधी टोळी सक्रीय असून ती देशाला अपकीर्त करण्यासाठी विदेशी शक्तींचा वापर करत आहे. बहुसंख्य हिंदू असलेल्या देशात ‘श्रीरामाचे अस्तित्व होते’, हे पटवून देण्यासाठी, तसेच त्याच्या जन्मभूमीच्या मुक्तीसाठी संघर्ष करावा लागला, यातूनच हे अपकीर्ती करण्याचे षड्यंत्र असल्याचे लक्षात येते.