
सातारा, १६ जून (वार्ता.) – आशासेविका आणि गटप्रवर्तक यांच्या विविध मागण्यांसाठी १५ जूनपासून संप चालू करण्यात आला आहे. याला १०० टक्के प्रतिसाद मिळत आहे. कोरोना काळात तुटपुंज्या मानधनामध्ये सेवा देऊनही मागण्या मान्य होत नसल्याने हा संप करण्यात आला आहे. सहकारमंत्री तथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील आणि खासदार श्रीनिवास पाटील यांना विविध मागण्यांचे निवेदन आशासेविका अन् गटप्रवर्तक यांच्या वतीने देण्यात आले.
गत २ वर्षांपासून आशासेविका आणि गटप्रवर्तक तुटपुंज्या मानधनावर सेवा पार पाडत आहेत. त्यातही मानधन अल्प आणि सेवा अधिक अशी स्थिती आहे. आशासेविकांनी प्रतिमाह १८ सहस्र, तर गटप्रवर्तकांनी प्रतिमाह २२ सहस्र रुपये मानधनाची मागणी केली आहे. तसेच आशासेविकांना मास्क, सॅनिटायझर, हातमोजे, थर्मामीटर, स्कॅनगन आदी साहित्य द्यावे आणि गटप्रवर्तकांना ५० लाख रुपयांचे विमा संरक्षण द्यावे, अशी मागणी निवेदनामध्ये करण्यात आली आहे.
दादर येथे बेस्ट बसचा अपघात : दोघांचा मृत्यू, तर १३ जण घायाळ
तरुणांकडून रिक्शाचालकाला मारहाण !
सिंधुदुर्ग जिल्ह्यात शाळांमधून होणारी विद्यार्थ्यांची लूट तात्काळ थांबवा !
श्री विठ्ठलमूर्ती संवर्धनासाठी रासायनिक लेपनाला विरोधच; धर्मशास्त्रानुसार लेपन करा ! – महाराष्ट्र मंदिर महासंघ
हिंदूंनो धर्माभिमान जागृत करून धर्मरक्षणासाठी सिद्ध व्हा ! – कु. क्रांती पेटकर, हिंदु जनजागृती समिती
भ्रमणभाषच्या जगात वावरतांना श्रीकृष्णाचे स्मरण ठेवा – ज्येष्ठ ब्रह्मचारी श्रीमान रेवतीनंदन दास