काश्मिरी हिंदूंचे सामाजिक आणि सांस्कृतिक पुनर्वसनही व्हायला हवे ! – राहुल कौल, अध्यक्ष, यूथ फॉर पनून कश्मीर

श्री. राहुल कौल

विस्थापित काश्मिरी हिंदूंनी पुनर्वसन होतांना काश्मीरमध्ये जायचे कुठे ? नागरिकत्व सुधारणा कायद्याद्वारे शेजारील देशांतून हिंदूंना बोलावण्यासाठी आपण प्रयत्न करतो आहोत, मग आपल्याच राष्ट्रातील काश्मिरी हिंदूंसाठी आपण प्रयत्न करण्यात अल्प का पडत आहोत ? कलम ३७० नंतर स्थिती तीच आहे. काश्मिरी हिंदूंचे पुन्हा ८ व्या वेळी पलायन होणार नाही, हे सरकार ठामपणे सांगू शकते का ? काश्मिरी हिंदूंचे सामाजिक आणि सांस्कृतिक पुनर्वसनही व्हायला हवे.