काँग्रेसवाले आणि गोहत्येचे समर्थन करणारे यांना याविषयी काय म्हणायचे ?

भारताचार्य पू. (प्रा.) सु.ग. शेवडे

अ. मोहनदास गांधी करत असलेली प्रार्थना !

स्वस्ति प्रजाभ्यः परिपालयन्तां न्याय्येन मार्गेण महीं महीशाः ।
गोब्राह्मणेभ्यः शुभमस्तु नित्यं लोकाः समस्ताः सुखिनो भवन्तु ।।

अर्थ : प्रजेचे कल्याण होवो, शासनकर्ते न्याय्य मार्गाने पृथ्वीचे परिपालन करोत, गायी आणि ब्राह्मण यांचे नित्य कल्याण होवो अन् सर्व लोक सुखी होवोत.

ही पारंपरिक प्रार्थना आहे.

आ. गायीची ऋग्वेदात २१ नावे आली आहेत. त्यात एक आहे ‘अन्घ्या’ आणि बैलाला म्हटले आहे ‘अघ्न्य’, म्हणजे मारू नये, अशी (गाय) आणि (बैल अर्थातच) मारू नये असा.

इ. जैन कवी नरहरीने अकबराच्या राजवाड्यावर गोवधबंदीसाठी गायींचा मोर्चा नेला होता. अकबराने गोवधबंदीचा कायदा केला होता. किंबहुना असे म्हणतात की, बाबरापासून बहादूरशहापर्यंत सर्व मोगल राजांच्या राज्यात गोवंश हत्याबंदीचा कायदा होता.

– भारताचार्य पू. (प्रा) सुरेश गजानन शेवडे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

(साभार : ग्रंथ ‘भारतीय संस्कृती’)