मुंबई – तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या हानीची पहाणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे २१ आणि २२ मे असे २ दिवस कोकणचा दौरा करणार आहेत. हानीग्रस्त भागाची पहाणी करून ते गावकर्यांशी संवाद साधतील. यानंतर अधिकार्यांसमवेत बैठक घेऊन चर्चाही करतील. तौक्ते वादळामुळे रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बागायतदारांची हानी झाली आहे. घरांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला आहे, तसेच मासेमारांच्या बोटींचीही हानी झाली आहे. यापूर्वी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कोकणचा दौरा करून हानीग्रस्त नागरिकांना तातडीने साहाय्य करण्याचे आवाहन राज्यशासनाकडे केले आहे.
सनातन प्रभात > Location > आशिया > भारत > महाराष्ट्र > तौक्ते वादळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आजपासून २ दिवसांचा कोकणदौरा !
तौक्ते वादळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आजपासून २ दिवसांचा कोकणदौरा !
नूतन लेख
- PEN NO For Goa Students : गोव्यात पूर्व प्राथमिक ते १२ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मिळणार ‘परमनंट एज्युकेशन नंबर’ ! – शिक्षण खात्याचा निर्णय
- उद्धव ठाकरे यांनी घेतले श्री महालक्ष्मीदेवीचे दर्शन !
- Loksabha Elections 2024 : गोव्यात ८८ आदर्श, ८० पर्यावरणपूरक आणि ४० ‘पिंक’ मतदान केंद्रे
- Boycott Loksabha Elections 2024 : ग्रामस्थांनी निवडणुकीच्या प्रचारावर बंदी घातल्यानंतर शिरवल (सिंधुदुर्ग) गावातील रस्त्याच्या कामाला प्रारंभ !
- Mumbai HC Slams Goa Govt : सरकारच्या अनास्थेमुळे सरकारी भूमीवर अतिक्रमण करणे सहजतेने शक्य ! – उच्च न्यायालयाचे सरकारवर ताशेरे
- १० मे या दिवशी कल्याण येथे पंतप्रधान येणार असल्याने रस्त्यांची दुरुस्ती