
नगर – राहुरी येथील पत्रकार रोहिदास दातीर यांचे अपहरण आणि हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय कुलथे याला उत्तर प्रदेशातील फतेहपूर जिल्ह्यातून अटक केली असल्याची माहिती श्रीरामपूर विभागाचे पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांनी दिली.
राहुरी येथील एका साप्ताहिकाचे संपादक आणि माहिती अधिकार क्षेत्रात काम करणारे पत्रकार रोहिदास दातीर यांचे ६ एप्रिल या दिवशी अपहरण झाले होते. त्यानंतर काही घंट्यातच त्यांचा मृतदेह आढळून आला. या प्रकरणी राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांनी आरोपी लाला उपाख्य विक्रम माळी आणि तौफिक मुक्तार शेख यांना अटक केली होती. त्यानंतर हे प्रकरण श्रीरामपूर विभागाचे पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्याकडे आले. त्यांनी मुख्य आरोपी कान्हू गंगाराम मोरे, अक्षय कुलथे यांना अटक केली. पोलीस पुढील तपास करीत आहेत.
Mohammad Rafiq Naik Arrested: पाकिस्तानी आतंकवाद्यांना साहाय्य करणार्या महंमद रफिक नाईक याला काश्मीरमधून अटक !
Maharashtra Police Vacancies : महाराष्ट्र पोलीस शिपाई आणि पोलीस उपनिरीक्षक यांची २३ सहस्रांहून अधिक पदे रिक्त !
वैध ‘प्रिस्क्रिप्शन’विना गर्भपाताच्या गोळ्यांची खरेदी-विक्री करू नका !
मोरजी येथे दुसर्या दिवशीही अवैध बांधकामांवर कारवाई
उल्हासनगर येथे घरफोडी करणार्या धर्मांधाला अटक; १० लाख ९० सहस्र रुपयांचे दागिने जप्त !
Sewri Mumbai Muslims Attack : क्षुल्लक कारणावरून मुसलमानांकडून हिंदूंना भीषण मारहाण