

ही हिंदु राष्ट्राची सुंदर गुढी डौलाने उभी केली, कुणी बरे ? ।
हे दिव्य स्वप्न (टीप १) दिधले, सत्यात ते उतरविले, कुणी बरे ? ॥ १ ॥
हा गुरुकृपायोगाचा प्याला सारा अमृताने भरला, कुणी बरे ? ।
ही जादुई प्रक्रिया निर्मिली, अंतःकरणाने निर्मल केली, कुणी बरे ? ॥ २ ॥
हे भव्य सत्संग निर्मिले, भावामृताने सारे भरले, कुणी बरे ? ।
अमूल्य ग्रंथ संकलित केले, आनंदस्वरूप ठेवा दिधला, कुणी बरे ? ॥ ३ ॥
हे वैकुंठरूपी आश्रम उभारले, प्रीतीने सारे भरले, कुणी बरे ? ।
ही साधक-फुले सुगंधित केली, रंगांनी (गुणांनी) सारी भरली, कुणी बरे ? ।
या घोर आपत्काली, रक्षिले तळहातीच्या फोडापरी, कुणी बरे ? ॥ ४ ॥
हे करी सर्व तो हरि(टीप २), कुशल बहु परि जयाची माया ।
रक्षितो सार्या जगाला, चला सारे नमूया तया ॥ ५ ॥
टीप १ : हिंदु राष्ट्र स्थापनेचे
टीप २ : परात्पर गुरु डॉ. आठवले
– श्री. विलास महाडिक, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२.४.२०२१)
| • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |
बुद्धीच्या स्तरावर असलेले विज्ञान अन् बुद्धीपलीकडील अध्यात्म !
सतत आनंदी असलेल्या आणि नृत्यकलेप्रती समर्पणभाव असलेल्या मडगाव (गोवा) येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (कु.) चांदणी आसोलकर (वय ३१ वर्षे) !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असणार्या बार्शी (जिल्हा सोलापूर) येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (श्रीमती) सुभद्रा ज्ञानोबा गोरे (वय ९२ वर्षे) !
व्यक्तीची आध्यात्मिक पातळी ५० टक्क्यांहून अधिक झाली की, तिच्या मनातील नकारात्मक विचार जाऊन तिची ईश्वराची ओढ वाढते !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ‘साधकांच्या त्रासांवरील उपाय शोधण्याच्या पद्धतीत होत गेलेले पालट’ या लिखाणाचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण !